एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणासाठी पवार-ठाकरे-देशमुख अनुकूल? आदित्य, रोहित म्हणतात...

महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र दिसू शकतात, तसे संकेत पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत.

संगमनेर : आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र दिसू शकतात, तसे संकेत पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत. संगमनेर येथे आयोजित एका कार्यक्रमात दोन्ही नेते बोलत होते.

काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस आमदार धीरज देशमुख आणि आमदार झिशान सिद्दिकी एकाच मंचावर उपस्थित होते. गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमादरम्यान अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला की, संपूर्ण महाराष्ट्र सध्या पाहातोय की, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार एकत्र काम करत आहेत, हे पाहताना आम्हाला खूप छान वाटतंय. हेच चित्र येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळेल का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, नक्कीच, गेल्या काही काळापासून आम्ही तिन्ही पक्षाचे नेते मिळून काम करतोय. या काळात एक गोष्ट मला जाणवली आहे की, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षांसोबत काम करणं सोपं आहे. कारण ही आपल्यासारखी लोकं आहेत. हे नेते लोकांचा विचार करतात. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्राचा विचार करतात. आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे, तीन वेगळया टोकांचे पक्ष आहेत. पण तरीदेखील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. राज्यासाठी एकत्र काम करत आहेत. हिच आपल्या देशाची लोकशाही आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, अजून एक महत्त्वाची गोष्ट नमूद करायची आहे की, आमच्या तिन्ही पक्षांमधील नेत्यांचे चांगले ऋणानुबंध होते आणि आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक होतो, परंतु आमचे जवळचे लोक एकमेकांच्या पक्षात आहेत. पवार कुटुंबासोबतचे आमचे संबंध तर खूपच मजबूत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबतही आमचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्यासोबत काम करणं सोपं होतं. ते मुख्यमंत्री असताना आमचा पक्ष विरोधात होता, परंतु कोणतीही कटुता नव्हती. माझी आणि धीरजची मैत्री आहे, माझी आणि रोहितची मैत्री आहे. माझ्या आजोबांची (बाळासाहेब ठाकरे) शरद पवारांसोबत खूप घट्ट मैत्री होती. ही सगळी नाती आता जवळ आली आहेत. कौटुंबिक नाती, मैत्रीची नाती एकत्र आली आहेत. विशेष म्हणजे आम्ही अशा वेळी एकत्र आलो आहोत जेव्हा या राज्याला त्याची गरज होती.

अवधूत गुप्ते यांनी हाच प्रश्न आमदार रोहित पवार यांना विचारला. त्यावर रोहित म्हणाले की, महाविकास आघाडीचं जे समीकरण झालंय ते एका विचाराचं आहे. हा एकत्र येण्याचा विचार पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंच्या, शरद पवारांच्या, विलासराव देशमुखांच्या मनात यापूर्वी आला असेलही. परंतु ते कधी बोलले नसतील. ते शक्य झालं नसेल. परंतु चार महिन्यांपूर्वी हा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आला. त्यांनी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं, त्यामुळे सर्वांची मनं एकत्र आली. वेगळं समीकरण बनलं आणि लोकांची सत्ता स्थापन झाली. पुढील काळात निवडणुका होणार आहेत. तेव्हा सर्वसामान्यांसाठी योग्य ते राजकीय समीकरण पाहायला मिळेल. नगर जिल्ह्यातसुद्धा महाविकास आघाडी आहे. हे समीकरण बऱ्याच टिकाणी पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget