एक्स्प्लोर

माझाच्या पत्रकाराचा चक्रीवादळावर 'विजय'; मनाचा थरकाप उडवणारा अनुभव

'विजय, तू जिंकलास', अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भयानक वादळातून बचावलेल्या माझाचे कोल्हापूर प्रतिनिधी विजय केसरकर यांचा भावूक करणारा अनुभव.

मुंबई : राज्यात  'निसर्ग' चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळाच्या तडाख्यात नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या. या परिस्थितीत एबीपी माझाचे अनेक शिलेदार वादळासंबंधी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते. मुंबई, पुणे, उरण, अलिबाग, रत्नागिरी, श्रीवर्धन, पालघर अशा वादळाचा प्रभाव जास्त असलेल्या ठिकाणाहून एबीपी माझाचे प्रतिनिधी वेळोवेळी अपडेट देत होते. या दरम्यान त्यांना देखील वादळाच्या कहराचा सामना करावा लागला. 'निसर्ग ' चक्रीवादळाची आपल्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जाऊन माहिती पोहोचवणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामन यांना खायलाही मिळालं नाही. त्यांना रात्र गाडीत काढावी लागली. आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ आपलं हे काम आहे, म्हणून अशा अत्यंत अवघड परिस्थितीत त्यांनी त्या परिसरात दोन दिवस काढले आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली. याच वादळाचं हरिहरेश्वर इथं वृत्तांकन करायला गेलेले एबीपी माझाचे कोल्हापूर प्रतिनिधी विजय केसरकर हे या वादळाच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले.  वादळाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेले विजय केसरकर आणि कॅमेरामन प्रमोद सावंत यांच्याशी तीन जून रोजी दुपारी बारा वाजल्यापासून अचानक संपर्क तुटला होता. ते यानंतर तब्बल 36 तासानंतर संपर्कात आल्याने जीव भांड्यात पडला. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरातल्या लोकांची काय अवस्था झाली असेल. कार्यालयामध्ये किती धांदल उडाली असेल, याबाबत कल्पना न केलेलीच बरी. भयानक आणि थरकाप उडवणारा अनुभव  विजय केसरकर आपला भयानक आणि थरकाप उडवणारा अनुभव सांगताना म्हणतात, देवाच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. आम्ही सुदैवाने वाचलो. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या हॉटेलचे छतच उडून गेले. आम्ही जवळपास तीन तास एका शौचालयाचा सहारा घेऊन बसून होतो. खिडकीतून आम्ही बाहेर पाहात होतो. बाहेर अनेक घरांवरील पत्रे, झाडं हवेत उडत होते. आम्ही दुपारी श्रीवर्धनला जाण्यासाठी निघालो. रस्त्याने जात असताना एक झाड रस्त्यावर कोसळलं होतं. तिथून यू टर्न घेत असताना एक भली मोठी फांदी आमच्या गाडीवर पडली. सुदैवाने ती पडताना एका तारेवर अडकली आणि आम्ही खालून निघालो, असं त्यांनी सांगितलं. आम्ही मग जिथं होतो तिथून आमचा संपर्क 11.30 वाजता तुटला. वादळ इतकं जोरात होतं की, आम्हाला पिलरला घट्ट पकडून उभा राहावं लागलं. त्यात हात सटकल्याने अचानक मी 25 ते 30 फुटापर्यंत मी हवेच्या दाबाने उडत होतो. हा सगळा प्रसंग जीवघेणा होता. या 25 ते 30 सेकंदाच्या काळात सगळे नातेवाईक डोळ्यासमोरुन गेले. हा प्रसंग सांगताना विजय केसरकर यांना अश्रू अनावर झाले. वादळ शांत झाल्यानंतर मी, कॅमेरामन आणि चालक अक्षरशा रडलो. आमचा काहीही कॉन्टॅक्ट होत नव्हता. लोकं देखील प्रचंड घाबरलेले होते, असं विजय केसरकर यांनी सांगितलं. VIDEO | विजय केसरकर यांचा अनुभव ऐका त्यांच्याकडूनच गृहराज्यमंत्री म्हणाले 'विजय तू जिंकलास' एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय केसरकर यांचा हा जीवघेणा अनुभव ऐकल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करत 'विजय, तू जिंकलास' असं म्हटलं आहे. सतेज पाटील यांनी म्हटलंय की, प्रसंग कोणताही असो, तो आपल्याला समजावा म्हणून आपला जीव धोक्यात घालून पत्रकार काम करत असतात. आपल्या नजरेच्या पलीकडे सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष कित्येकदा आपल्याला दिसत नाही! कोकणातील चक्रीवादळातून अत्यंत धैर्याने सुखरूप बाहेर पडलेल्या एबीपी माझाचा रिपोर्टर आणि आमच्या कोल्हापूरच्या विजय केसरकर ची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी आहे. आज ती पाहताना तोंडातून शब्द आले "जिंकलास विजय तू!" असं त्यांनी म्हटलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget