एक्स्प्लोर

Sushilkumar Shinde Majha Katta : सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पुन्हा उभी केली पाहिजे : सुशीलकुमार शिंदे

गरिब माणसांच्या मनात गांधी कुटुंबाविषयी खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, ती होईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

Sushilkumar Shinde Majha Katta : मी कधीही जी-23 किंवा आणखी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नसल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. गांधी कुटुंबाविषयी लोकांच्या मनात वेड आहे. गरिब माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, ती होईल असा विश्वास असल्याचे शिंदे म्हणाले.

काँग्रेसचा बेस हा गरिब माणूस आहे. तर दुसरा सर्वधर्म समभाव हा आहे. या सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे असे शिंदे म्हणाले. काँग्रसचे अनेक पराभव झाले, त्यानंतर पुन्हा काँग्रसचे राज्य आले असे शिंदे म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.


Sushilkumar Shinde Majha Katta : सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पुन्हा उभी केली पाहिजे : सुशीलकुमार शिंदे

आता त्यांनी राजकारणात पुढाकार घेऊ नये : उज्वला शिंदे 

सुशिलकुमार शिंदे यांचा स्वभाव मवाळ आहे, त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. ते पदासाठी कधीही आग्रही नसतात असे उज्वला शिंदे म्हणाले. आता त्यांनी थोडेसे निवांत बसावे. त्यांनी राजकारणात जास्त पुढाकार घेऊ नये असे मला वाटते असे उज्वला शिंदे म्हमाल्या. घरामध्ये लक्ष देण्याचे त्यांना आणखी जमत नसल्याचे उज्वला शिंदे म्हणाल्या. आता ते कुटुंबाच्या जवळ आले आहेत. ज्यावेळी त्यांना दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी आली पण ते झाले नाहीत. त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना बोलावे असे मला वाटत होते असे उज्वला शिंदे म्हणाल्या. मात्र, सोनिया गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरवले होते असे त्या म्हणाल्या. मंत्रीपदासाठी प्रणिती शिंदे या आग्रही नाहीत, आज ना उद्या तिला मंत्रीपद मिळेल असेही उज्वला शिंदे म्हणाल्या.

मैत्रीत माणूस कसा फसतो याचा अनुभव आला

शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी काही लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. त्यावेळी ते पत्र घेऊन विलासराव देशमुख माझ्याकडे आले होते. त्यावेळी विलासराव मला म्हणाले की, या पत्रावर सही करा. मी न वाचताच मी त्यावर सही केली. त्यानंतर मला कळाले की त्या पत्रामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावरुन काढावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मैत्रीत माणूस कसा फसतो याचा त्यावेळी मला अनुभव आला. पण त्यावेळी माझी चूक झाल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.

इंदिरा गांधी या टिका करणाऱ्याचे एकूण घेत होत्या. अनेकांनी जरी त्यांच्याकडे तक्रारी केल्या तरी त्याच्या खोलात जाऊन त्या चौकशी करत होत्या असे शिंदे म्हणाले. नागपूरला मी सावरकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला गेलो होतो. त्यावेळी एका खासदाराने इंदिरा गांधी यांच्याकडे माझी तक्रार केली होती. काँग्रेसचा मंत्री सावरकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला गेल्याचे इंदिरा गांधींना सांगितले होते, ही आठवण शिंदे यांनी सांगितली. पोलीस अधिकारी म्हणून मला खूप पुढे जाण्याची इच्छा होती असेही सुशिलकुमार शिंदे म्हणाले.  

उज्वला शिंदेंनी सांगितली इंदिरा गांधीची आठवण

ज्यावेळी सुशिलकुमार शिंदे मंत्री झाले त्यावेळी दिल्लीत आम्ही इंदिराजींना भेटायला गेलो. आम्ही तिथे गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला पुढे बोलावले. यावेळी साडी सुंदर आहे. तुमची निवड चांगली आहे अशा इंदिरा गांधी म्हणाल्याचे उज्वला शिंदे यांनी सांगितले. मला त्यावेळी खूप अभिमान वाटल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget