एक्स्प्लोर

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव

कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर फिरत आहेत. या बातम्या खोट्या आसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. आहे

औरंगाबाद : मी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत, असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. ते आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर फिरत आहेत. त्यावर सत्तार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी सत्तार यांना राजीनाम्याविषयी, पक्ष सोडण्याविषयी प्रश्न विचारले. यावर सत्तार म्हणाले की, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, परंतु आत्ता नाही. उद्या मी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन.

सत्तार म्हणाले की, माझ्याबद्दल लोक वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, मी राजीनामा दिल्याच्या पुड्या सोडत आहेत. त्याची माहिती मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहे. मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडेन. त्यानंतर ते जो निर्णय घेतील. तो मला मान्य असेल. परंतु मी आत्ता त्यावर काहीही बोलू शकत नाही. वेळ आल्यावर मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. मी आज संध्याकाळी मुंबईला जाणार उद्या माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल.

कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर झळकत आहेत. परंतु या बातम्या खोट्या असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांना भाजपमध्ये जायचं होतं. पण स्थानिक समीकरणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळालं. यामुळे अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.

30 डिसेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.

नाराज आमदार भाजपच्या संपर्कात : सूत्र भाजप नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपच्या गोटातून वारंवार म्हटलं जात होतं की, मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या, त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोणाला मंत्रीपद मिळतं, कोणाला नाही यानुसार नाराजांना कसं कुरवाळता येईल, त्यांना आपल्याकडे कसं घेता येईल, याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु झालेल्या होत्या.

मी राजीनामा दिलेला नाही, राजीनाम्याविषयी पुड्या सोडल्या : अब्दुल सत्तार | ABP MAJHA अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका | Aurangabad | ABP Majha अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा?| ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget