एक्स्प्लोर

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. म्हणूनच 'आठवणीतील वारी आणि वारीच्या आठवणी'च्या माध्यमातून आम्ही वारीच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा राहिला असता. ज्याच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर चालून दिवस-रात्र एक केला ते वारकरी आज भरुन पावले असते.

कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. म्हणूनच 'आठवणीतील वारी आणि वारीच्या आठवणी'च्या माध्यमातून आम्ही वारीच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी तुमच्यासोबत जागवण्याचा प्रयत्न केला. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा राहिला असता. ज्याच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर चालून दिवस-रात्र एक केला ते वारकरी आज भरुन पावले असते.

आषाढी एकादशी.. हा दिवस महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीचा दिवस असतो. ज्यांना शक्य आहे असे लाखो वैष्णव जण आषाढीसाठी पंढरपुरात पोहोचताच, मात्र ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही त्याच्या घराघरात आणि मनामनात आज सावळ्या विठुरायाची आराधना होत असते.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये बारा ते पंधरा लाखांच्या जवळपास भाविक येत असत. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज एकादशीच्या दिवशी तर पंढरपूरमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. दर्शन रांग आतापर्यंत पंधरा किलोमीटरपर्यंत लांब गेली असती. दोन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे असते तर लाखो विठ्ठल भक्त केवळ मुखदर्शन करुन धन्य झाले असते.

प्रथेप्रमाणे वारी निघाली नसली तरी यावर्षी संतांच्या पादुका या पंढरपूरमध्ये पोहोचल्या खऱ्या पण वारकऱ्यांविना पंढरपूर सुनेसुने वाटत होते. आजच्या दिवशी पंढरपूरमधल्या घराघरातून, गल्लीतून, रस्त्या-रस्त्यातून केवळ ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष झाला असता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील आषाढी एकादशीसाठी हजारो पालखी आज पंढरपूरमध्ये पोहोचल्या असत्या. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे राज्यभरातील केवळ नऊ संतांच्या पादुकांना वारीसाठीची परवानगी देण्यात आली होती.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

काल ज्या वेळी आळंदीहून माऊली महाराजांचे आणि वरुन तुकोबांची पादुका या एसटी पंढरपूरकडे येत होते, त्यावेळी रस्त्यात कुठे रांगोळी काढलेल्या होत्या तर कुठे एसटीवर पुष्पवृष्टी करुन ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष केला जात होता. खरंतर कोरोनाच्या संकटामुळे आषाढीसाठी पायी वारी करत जे लोक आज पंढरपूरमध्ये पोहोचले असते, त्यांना रस्त्याच्या कडेला उभं राहून माऊलींना डोळे भरुन पाहता सुद्धा आले नाही.

प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज चांद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता. कारण एकादशीला पंढरपूरमध्ये पोहोचलेले भाविक हे पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये स्नान करतात, त्यानंतरच पांडुरंग दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करुन आपली वारी पूर्ण करतात. आजच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुरु असलेल्या ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष संपूर्ण आसमंतामध्ये पोहोचला असता. मात्र कोरोनामुळे आज वाळवंट स्तब्ध झालं आहे तर चंद्रभागाही भक्तांविना पोरकी झाली आहे.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

आषाढीला पंढरपुरात वारकरी नाही असे मागच्या तीन पिढ्यात कुणी ही पाहिले नव्हते. मात्र कोरोना आषाढी वारीवर काळ म्हणून आला आणि शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली. वारीवर संकटं आली नाहीत असे नाही. अगदी इतिहासात प्लेग आला त्यावेळीही वारीवर बंधन आले, मात्र त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील भाविक आषाढीला पोहोचले होते. मात्र कोरोनाच्या संकटात सापडलेली एकादशी वारकरी कधीच विसरणार नाहीत.

वारी हा केवळ आध्यात्मिक सोहळा नाही तर समाजातील भेदभाव विसरुन समानतेचा धागा जोडणारा एक असा प्रवास आहे. आणि हाच वारसा राज्यभरातील लाखो लोक एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा अगदी सहज सोपवत आले आहेत. म्हणूनच जगाच्या पाठीवर आषाढी वारी हा एकमेव कार्यक्रमाचे जिथे जवळपास एक महिना शेकडो किलोमीटरचे अंतर चालून येणारी मंडळी हे कोणत्या एका धर्माची. कोणत्या एका जातीची..कोणत्या पंथाचे नसतात.. किंबहुना अनोळखी लोक एकत्र येऊन आपल्या परमेश्वरा प्रती किती एकरुप झालेले असतात हे जगाच्या पाठीवर कुठेच बघायला मिळत नाही.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

खरंतर कोरोनाच्या या संकटामुळे यावर्षी आषाढी वारी निघाली नाही. मात्र याच वारीचे प्रत्येक टप्पे समजून घेताना आम्ही त्या आठवणी तुमच्यासोबत जागवण्याचा प्रयत्न केला. यावर्षी कोरोनामुळे वारी निघाली नसली तरी वारीच्या प्रत्येक टप्प्याला एक प्रथा आणि परंपरा आहे या प्रत्येक मुक्कामाला एक इतिहास आहे, तोच इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता.

वारीची महती कळण्यासाठी आयुष्यात एकदातरी वारी करावी असं म्हणतात. यापूर्वी वारीतला हा सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाच्या या संकटामुळे वारी रद्द झाल्यामुळे आम्ही वारीच्या आठवणी तुमच्यासोबत जागवल्या. पण भविष्यात पुन्हा वारीच्या आठवणी तुमच्यासमोर मांडण्याची वेळ आमच्यावर येऊ नये एवढीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.

Ashadhi Ekadashi | ना वैष्णवांचा मेळा, ना कोणतीही लगबग; आषाढी एकादशी दिवशी सुन्न चंद्रभागेचा तीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंतTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 PmManoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Embed widget