एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील, असा हल्लाबोल  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  त्यांनी केला आहे.

Aaditya Thackeray : "राजकारण संपवून शाश्वत विकासावर काम करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही राहिलं तरीही लोकांच्या हिताचा विचार करायला हवा, खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील," असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  त्यांनी केला आहे. ते पुण्यातील  पत्रकार परिषदेत बोलत होते. आपले मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात जाऊन गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ते फक्त गणपती मंडळ आणि दहीहंडीत फिरण्यात व्यस्त आहेत, अशीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना पहिल्यांंना 80 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार केला होता. तेव्हा देखील केंद्रात त्यांचं सरकार होतं आणि महाराष्ट्रात मविआचं सरकार होतं. तरीही दोन्ही कामं सुरळीत सुरु होती. मात्र खोके सरकार आल्यावर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात का जात आहेत?, महाराष्ट्राच्या वाटेला नेहमी अपयश का येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी मंत्री कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहिती नाही कारण अजूनही बांधावर कोणीही दौरा केला नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहित नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का?

महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांचं मोठं नुकसान झालं आहे. उदय सामंतानी एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली?, याचा अर्थ राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही. हे आपल्याला माहित आहे तरीही महाराष्ट्रात एअरबस हा प्रकल्प आणू असं सांगत होते, असाही आरोप त्यांनी मंत्री उदय सामंतांवर केला आहे. या खोके सरकारवर अनेक उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

पुण्यात शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे

पुण्यात काही तासांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सगळ्यांच्या एकत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. मेट्रो, बिल्डर, महापालिकेने एकत्र येत यावर उपाय काढला पाहिजे. त्यानुसार नियोजन करायला पाहिजे. मुंबईतील हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलं नाही त्या पद्धतीची उपाययोजना पुण्यात करायला हवी, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget