एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील, असा हल्लाबोल  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  त्यांनी केला आहे.

Aaditya Thackeray : "राजकारण संपवून शाश्वत विकासावर काम करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही राहिलं तरीही लोकांच्या हिताचा विचार करायला हवा, खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील," असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  त्यांनी केला आहे. ते पुण्यातील  पत्रकार परिषदेत बोलत होते. आपले मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात जाऊन गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ते फक्त गणपती मंडळ आणि दहीहंडीत फिरण्यात व्यस्त आहेत, अशीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना पहिल्यांंना 80 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार केला होता. तेव्हा देखील केंद्रात त्यांचं सरकार होतं आणि महाराष्ट्रात मविआचं सरकार होतं. तरीही दोन्ही कामं सुरळीत सुरु होती. मात्र खोके सरकार आल्यावर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात का जात आहेत?, महाराष्ट्राच्या वाटेला नेहमी अपयश का येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी मंत्री कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहिती नाही कारण अजूनही बांधावर कोणीही दौरा केला नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहित नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का?

महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांचं मोठं नुकसान झालं आहे. उदय सामंतानी एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली?, याचा अर्थ राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही. हे आपल्याला माहित आहे तरीही महाराष्ट्रात एअरबस हा प्रकल्प आणू असं सांगत होते, असाही आरोप त्यांनी मंत्री उदय सामंतांवर केला आहे. या खोके सरकारवर अनेक उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

पुण्यात शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे

पुण्यात काही तासांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सगळ्यांच्या एकत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. मेट्रो, बिल्डर, महापालिकेने एकत्र येत यावर उपाय काढला पाहिजे. त्यानुसार नियोजन करायला पाहिजे. मुंबईतील हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलं नाही त्या पद्धतीची उपाययोजना पुण्यात करायला हवी, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget