एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील, असा हल्लाबोल  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  त्यांनी केला आहे.

Aaditya Thackeray : "राजकारण संपवून शाश्वत विकासावर काम करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही राहिलं तरीही लोकांच्या हिताचा विचार करायला हवा, खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, निवडणुकीसाठी जे सामोरं जायला तयार नाहीत ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील," असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  त्यांनी केला आहे. ते पुण्यातील  पत्रकार परिषदेत बोलत होते. आपले मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात जाऊन गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ते फक्त गणपती मंडळ आणि दहीहंडीत फिरण्यात व्यस्त आहेत, अशीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना पहिल्यांंना 80 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार केला होता. तेव्हा देखील केंद्रात त्यांचं सरकार होतं आणि महाराष्ट्रात मविआचं सरकार होतं. तरीही दोन्ही कामं सुरळीत सुरु होती. मात्र खोके सरकार आल्यावर महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात का जात आहेत?, महाराष्ट्राच्या वाटेला नेहमी अपयश का येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी मंत्री कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहिती नाही कारण अजूनही बांधावर कोणीही दौरा केला नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहित नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का?

महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांचं मोठं नुकसान झालं आहे. उदय सामंतानी एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली?, याचा अर्थ राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही. हे आपल्याला माहित आहे तरीही महाराष्ट्रात एअरबस हा प्रकल्प आणू असं सांगत होते, असाही आरोप त्यांनी मंत्री उदय सामंतांवर केला आहे. या खोके सरकारवर अनेक उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

पुण्यात शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे

पुण्यात काही तासांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सगळ्यांच्या एकत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. मेट्रो, बिल्डर, महापालिकेने एकत्र येत यावर उपाय काढला पाहिजे. त्यानुसार नियोजन करायला पाहिजे. मुंबईतील हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलं नाही त्या पद्धतीची उपाययोजना पुण्यात करायला हवी, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
Nana Patole: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Raj Thackeray House Monkey: राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Embed widget