एक्स्प्लोर
Advertisement
तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांसाठी सरासरी 72.76 टक्के मतदान
मुंबई : राज्यातील चार जिल्ह्यांतील 19 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 72.76 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
212 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यात होत आहेत. आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यातील या 19 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या सदस्यांच्या एकूण 409 जागांसाठी 1 हजार 947 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
थेट नगराध्यक्षपदाच्या 19 जागांसाठी 111 उमेदवारांमध्ये लढत झाली. या सर्व ठिकाणी एकूण 5 लाख 16 हजार 478 मतदारांसाठी 683 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी उद्या (19 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती सहारिया यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषदेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. त्याचबरोबर देसाईगंज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील 9-ब या जागेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेसाठी आता 22 जानेवारी 2017 रोजी मतदान होईल, असं सहारिया यांनी सांगितलं.
नगरपरिषदनिहाय सरासरी टक्केवारी :
औरंगाबाद:
कन्नड- 77.16
पैठण- 75.73
गंगापूर- 75.56
खुल्ताबाद- 79.77
नांदेड:
धर्माबाद- 70.73
उमरी- 72.33
हदगाव- 67.04
मुखेड- 73.66
बिलोली- 69.48
कंधार- 83.12
कुंडलवाडी- 81.46
मुदखेड- 71.45
देगलूर- 74.68
अर्धापूर (न.पं.)- 78.46
माहूर (न.पं.)- 78.56
भंडारा:
पवनी- 72.69
भंडारा- 66.10
तुमसर- 70.58
साकोली- 69.13
गडचिरोली:
गडचिरोली- 69.24
देसाईगंज- 78.75
एकूण सरासरी- 72.76
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement