एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue: भाजपचा पाण्यासाठीचा मोर्चा म्हणजेच 'ड्रामाबाजी'; जलील यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून मोर्चा काढण्यात येणार असून, त्यापूर्वी खासदार जलील यांनी भाजपवर टीका केली आहे.

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरून भाजपकडून आज भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. तर यावरून एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.पाण्यासाठी भाजपकडून काढण्यात येणारा मोर्चा म्हणजेच 'ड्रामाबाजी' असल्याचा खोचक टोला जलील यांनी लगावला आहे. 

यावेळी बोलताना जलील म्हणाले की, हा जल आक्रोश मोर्चा नाही तर भाजपचा राजकीय मोर्चा आहे.औरंगाबाद शहर फक्त शिवसेनेचा गड नसून तो आमचाही गड असल्याचा दाखवण्यासाठीच भाजप हा मोर्चा काढत आहे. त्यामुळे या दोघांच्या वादात सर्वसामान्याना गाडण्याचं काम केले जात आहे. जर असे मोर्चे काढल्याने शहराला पाणी मिळणार असेल तर मी सुद्धा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी तयार आहे. मोर्च्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात ठीक-ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे, पण भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा माहित आहे की, याने काहीही होणार नाही. त्यामुळे लोकांच्या घरा-घरात जाऊन त्यांना हंडे दिले जात असून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र लोकांनाही माहित आहे की, पाणी मिळणार नाही,असा आरोप जलील यांनी केला आहे. 

तर हा प्रामाणिक प्रयत्न असता... 

लाखो रुपयांचे बॅनर लावून असे मोर्चे काढल्याने काय होणार. त्यापेक्षा जर फडणवीस यांनी शहरात येऊन आम्हाला बोलवून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर कसा तोडगा काढला जाईल यासाठी प्रयत्न केले असता तर हा प्रामाणिक प्रयत्न असता. पण फक्त नाटक करण्यासाठी ते येत असून लाखो रुपये होर्डिंगवर खर्च करत आहे. जर हेच पैसे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी वापरले असते तर तेवढ्या पैश्यांमध्ये अनेक वस्त्यांमधील पाणी ऊपलब्ध करून देता आले असते, असेही जलील म्हणाले.  

लोकं मारतील म्हणून पाणी पट्टी कमी केली... 

मागील तीस वर्षांपासून महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या याच बहुमतावर त्यांनी सर्वात जास्त पाणी पट्टी वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. आता म्हणतात आम्ही दोन हजार रुपये कमी करतोय. कशाला करतायत तुमच्यावर तर गुन्हे दाखल केले पाहिजे, लोकांना लुटून खाल्लं आहे तुम्ही असाही आरोप जलील यांनी केला.आज निवडणूक जवळ आली अशावेळी लोकं आपल्याला मारतील म्हणून दोन हजार कमी केले. विशेष म्हणजे त्याचाही शिवसेना गाजावाजा करत असल्याच जलील म्हणाले. 

औरंगाबादकर जवाबदार.. 

औरंगाबाद शहरात पाणी टंचाईची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला जेवढी भाजप-शिवसेना जवाबदार आहे तेवढच औरंगाबादकर सुद्धा जवाबदार आहे. कारण औरंगाबादच्या लोकांनी कधीही पाण्यासाठी मतदान केलं नाही, तर फक्त जातीसाठी,धर्मासाठी,मशीद,मंदिर आणि नामांतरासाठी मतदान केलं असल्याचं जलील म्हणाले.  

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget