एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतायत; नामांतराच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: शरद पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत . आता नामांतराचा मुद्दा पवारांनी का काढला ? प्रकाश आंबेडकर यांनी निलंग्यातील सभेत उपस्थित केला प्रश्न. शरद पवार प्रत्युत्तर देणार?

लातूर: शरद पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत.आता ते आगीत तेल ओतत आहेत. नामांतर होऊन अनेक वर्षे झाली. आता तो मुद्दा कशासाठी काढला ? फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांना केला आहे. आरक्षण बचाव रॅली सोमवारी लातूर जिल्ह्यात दाखल झाली. उजनी लामजना निलंगा निटूर त्यानंतर लातूर शहरात रॅली दाखल झाली आहे. निलंगा येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट आरोप केला आहे. 

शरद पवार हे जातीय तेढ निर्माण करत आहेत. नामांतराचा मुद्दा हा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. आता त्या मुद्द्याला ते ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते करत असल्याचा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात: प्रकाश आंबेडकर

सगेसोयऱ्याचा आणि मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे. त्यांची मागणी मान्य झाली नाही तर ते 288 जागेवर निवडणूक लढवतील असे त्यांनी सांगितले होते. यावर मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढणे मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे.

सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी, मनोज जरांगे यांनी 288 जागा या लढवल्या पाहिजेत. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या निवडणुकीच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या जातील. राज्यातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला संपूर्णपणे दाबून टाकत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीला मनोज जरांगे यांनी सामोरे जावे . श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरीक करायला तयार नाही. याच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या भागातील श्रीमंत मराठे स्वतःला उत्तर प्रदेशमधील लोकासारखं सिंग म्हणून घेण्याची सुरुवात करत होते. मात्र, मोठ्याप्रमाणात टिंगलटवाळी झाल्यानंतर तो विषय मागे पडला, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

 बोगस अधिकाऱ्यांची चिडफाड सरकारने केली नाही तर आम्ही करू; बच्चू कडूंचा इशारा

दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरणाऱ्या बोगस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही गोळा करत आहोत. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचे आरक्षण हिसकावून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची चिरफाड आम्हीच करणार. यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार कमी पडलं तर आम्ही ते काम करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. ते सोमवारी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील शेतकरी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते.

दिव्यांग प्रमाणपत्र वापरून अनेक अधिकारी यांनी सरकारी नोकरीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम सुरू केला आहे. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचा आरक्षण हिसकावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई सरकारन करणं अपेक्षित आहे. सरकार यात कमी पडलं तर ती कारवाई आम्ही करू, असा स्पष्ट निर्वाळा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. असल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केलेले कारनामे उघड होत आहेत. बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी रुपेश पागोरे यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली आहे. असेच प्रकार राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केल्याचं आता उघड होत आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी ही सार्वत्रिक भावना असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले.

आणखी वाचा

शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत, फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न: बावनकुळे

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget