एक्स्प्लोर

लातुरात धुवांधार पाऊस, मांजरा धरण 95 टक्के भरले, 152 गावांना सतर्कतेचा इशारा

Latur Rain Update : मुसळधार पावसामुळे लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण 95 टक्के भरले आहे.

Latur Rain Update : परतीच्या पावसाने लातूरला चांगलेच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण 95 टक्के भरले आहे.  धरणाच्या वरील भागामध्ये मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा वेग वाढला आहे. धरणाच्या पुढील भागामध्ये मांजरा नदीवर असणारे 14 बॅरेजेसमधून अतिरिक्त पाणी सोडून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत.  मांजरा नदीवर 14 मोठे प्रकल्प आहेत. मांजरा नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नदीकाठ असणाऱ्या 152 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्व सूचना करण्यात आल्या आहेत,  अशी माहिती लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे.

मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे... आणखीन चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.. यामुळे जिल्हातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे... प्रत्येक तहसीलदारांना त्या त्या तालुक्यातील नदीकाठच्या गावात या सूचना पोहोचवण्याचे आदेश देण्यात प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये भागात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके, सोयाबीन, फुल शेती तसेच भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.  

रेणापूर तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस -
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव ,खरोळा, कुंभारवाडी, तळणी या गावांसह लातूर ग्रामीण भागतील अनेक गावांत दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे काढणी करून शेतात ठेवलेल्या आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खचले आहेत... ग्रामीण भागातील छोटे पूल पाण्या खाली गेले आहेत. खरोला, फरदपुर सारख्या भागातील शिवारात पाणीच पाणी झाले आहे. शेतात पाणी थांबले असल्यामुळे शेतीचे नुकसान खूप झाले आहे. 

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.  परतीच्या पावसानं शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे.  राज्यात 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 12 दिवसात सरासरी 7 दिवस पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा आमदारांना इशारा 
कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा आमदारांना इशारा 
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget