टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आसगावकरांची मागणी
टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली आहे.
TET paper leak case : टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली आहे. टीईटी पेपर फुटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार मात्र आमदार आणि खासदार खोडाफोडीचे राजकारण करण्यामध्ये मग्न असल्याचे आंसगावकर म्हणाले. महाराष्ट्रातून सुमारे सात लाख परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते असे ते म्हणाले. तसेच कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.
सरकारचा फोकस आमदार, खासदार फोडण्यात, अभिजीत दिपकेंची टीका
टीईटी पेपर फुटी प्रकरणावर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हे सिध्द झालं आहे भाजपचे सरकार केंद्रात असो अथवा राज्यात पेपर लिक झाल्याशिवाय ते घेऊ शकत नाही. हे डबल इंजिन नाही तर डबल लिक सरकार असल्याची टीका दिपके यांनी केली. यांचा फोकस, आमदार फोडण्यात खासदार फोडण्यात आहे. सिक्रेट ऑपरेशन व्यवस्थित होतात, पण पेपर सिक्रेट ठेवता येत नाही अशी टीका दिपके यांनी केली. हे तर तेच झालं की खून झाला आणि आम्ही खुनीला पकडलं आमच्यासाठी टाळ्या वाजवा. खून झाला नाही पाहिजे पेपर फुटला नाही पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तर मेसेज जाईल असे दिपके म्हणाले. जर केंद्रीय मंत्र्याने राजीनामा नाही दिला तर भुसे साहेब राजीनामा कसे देतील? राजीनामा झालाच पाहिजे असे दिपके म्हणाले. आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होऊ देत, मग त्यावर बोलू असे ते म्हणाले. श्रेय कोणाचाही असू दे जिम्मेदारी त्यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. मला वाटतं देशाच्या लोकशाहीसाठी राजीनामा झाला पाहिजे असे दिपके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Dada Bhuse on TET Exam Paper Leak: परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'
Before You Go
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर






















