एक्स्प्लोर

शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर

Rajesh Kshirsagar on Shatipeeth Expressway: शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

Rajesh Kshirsagar on Shatipeeth Expressway: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे, आज (19 जुलै) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये सातबारा उतारे घेतले होते. 

शेतीला पाचपट मोबदला पाहिजे, मोर्चातील शेतकऱ्यांची मागणी 

दरम्यान, शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. विरोधक शक्तीपीठ महामार्गाचे राजकारण करत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास मी आडवा उभा राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना बेस्ट रेट देण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या शिरोळ तालुक्यामधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे असं सांगण्यात येतं, त्याच शिरोळ तालुक्यातील 80 टक्के शेतकरी सातबारा उतारे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असेही आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. 

जयप्रभा स्टुडीओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करा 

दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तीपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडीओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केली. शिरोळ तालुक्यातील ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्याठिकाणी 70 टक्के शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत दिली.  निमशिरगांव गावातील सर्व बाधित शेतकरी एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध केला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. अश्विनी गुरव यांना निवेदन देवून सदरचे निवेदन बाधित शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जेवढी जमीन शक्तीपीठ महामार्गास जाणार आहे तेवढीच त्याबदलात जयप्रभा स्टुडीओची जागा जर राजेश क्षीरसागर शेतकऱ्यांच्या नावावर करत असतील तर खुशाल जमीनी घ्याव्यात अशा पध्दतीची मागणी करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Nagar Palika Election: कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिक पाळी रजा? Special Reports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Nagar Palika Election: कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
कागलला मुश्रीफ घाटगेंच्या युतीनं एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता 'भाई' धावणार! सभेचा मुहूर्तही ठरला
Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
Embed widget