एक्स्प्लोर

राज्याबाहेर ऊस घालण्यास राज्य सरकारकडून बंदीचे आदेश; अडचणीतील शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता, शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध

sugarcane crushing : साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश स्वागत करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

कोल्हापूर : राज्यातील ऊस बाहेरील राज्यात (sugarcane crushing) घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत यांनी आदेश काढले आहेत. यंदाच्या मोसमात राज्यातील ऊसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश स्वागत करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची सुद्धा कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयावरून सरकार आणि शेतकरी संघटना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

हा निर्णय का घ्यावा लागला? 

राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घालण्यामागे कारण म्हणजे यंदाच्या हंगामात कमी झालेले उत्पादन आणि पावसाने केलेला विपरित परिणाम ही मुख्य कारणे आहेत. यंदाच्या हंगामात राज्यात ऊस पीक खूप कमी झाले आहे. त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच सावध होत चलाखी करताना  राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे. 

राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा यासाठी सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे. राज्यात जुलै महिन्यातील अपवाद वगळता पावसाचे प्रमाण खूप कमी झालं आहे. राज्याच्या कोणत्याच विभागात सरासरीच्या सुद्धा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिना तर शतकातील सर्वाधिक कोरडा ठरला. त्यामुळे खरीप पिकांसह ऊसा उत्पादन देखील कमी झालं आहे. ही परिस्थिती असताना शेजारील कर्नाटक राज्यातील गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाची पळवा पळवी होऊ शकते. सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस देणार, आम्हाला अडवून दाखवा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

कर्नाटकचे साखर कारखाने लवकरच सुरु होण्याची शक्यता असल्याने सीमेवरील कोल्‍हापूर, सांगली, सोलापूर, लातूर जिल्ं‍ह्यातील ऊसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील साखर हंगाम 100 दिवसही चालणार नाही. दुसरीकडे, राज्यात कारखाने सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. 15 ऑक्‍टोबरपासून कारखाने सुरु करण्यासाठी मागणी होत आहे. दुसरीकडे, राज्यातील ऊस उत्‍पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन 400 रुपयांचा दुसरा हप्‍ता देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून सुरु आहे. या सर्वांचा राज्यातील गळीत हंगामावर होणार आहे. 

आदेश 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार

दरम्यान, राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ऊस गळीत हंगाम 2023-24 मध्ये साखर उद्योग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी परराज्यात ऊस घालण्यावर बंधन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात येत आहे. हा आदेश 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे.

निर्णयाने शेतकऱ्यांची कोंडी होणार

ऊसपट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र पावसाने दडी मारल्याने ऊसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. मान्सून हंगामापूर्वीही उपसाबंदीच्या निर्णयाने ऊसाला अपेक्षित पाणी मिळाले नसल्याने ऊसाचे उत्‍पादनावर परिणाम होणार आहे.  त्यामुळे शक्य तितक्या लवकर ज्या ठिकाणी जादा दर मिळेल तेथे शेतकरी ऊस घालण्याची शक्यता आहे. मात्र, बंदीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget