एक्स्प्लोर

कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन पेटले; स्वाभिमानी, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाचा भडका, किसान सभेकडून ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात अजून कोणत्याच कारखान्याकडून 3500 रुपयांवर पहिली उचल जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur Sugarcane Farmers Protest: नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी (Raju Shetti Bachchu Kadu news) एल्गार पुकारला असतानाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून (Kolhapur Sugarcane Farmers Protest) शेतकरी अत्यंत आक्रमक झाले असून आंदोलन पेटले आहे. शिरोळ तालुक्यात आंदोलनाचा भडका उडाला असून या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्त्यांकडून उग्र आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानीकडून यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली ऊचल 3751 रूपये व गत हंगामातील दुसरा हप्ता एफआरपी अधिक 200 रूपये देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अजून कोणत्याच कारखान्याकडून 3500 रुपयांवर पहिली उचल जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. 

दुसरीकडे, सीमावर्ती परिसरातून ऊसाची कर्नाटकात पळवापळवी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली, तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने कारखाने सुरू करण्यास अडचणी येत आहेत. साखरेचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांना देखील ऊसाला दर वाढवून मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर कोणतीही बैठक घेतली गेली नाही.

शेतकरी 'उसाच्या चिपाड्यासारखा' झाला 

शेतकऱ्यांनी जोपर्यंत पहिली उचल (first installment) जाहीर होत नाही, तोपर्यंत उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम दिली  आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपी घोषणा करणे आणि मागील थकीत देणी देणे आवश्यक आहे, परंतु हे पैसे मिळत नसल्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी 'उसाच्या चिपाड्यासारखा' झाला आहे, तर कारखानदार मात्र 'साखरेनं भरलेल्या पोत्यासारखं गलेलठ्ठ' झाले आहेत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. काही कारखान्यांनी एफआरपी किंवा पहिली उचल जाहीर केली असली तरी, जोपर्यंत चर्चा घडवून एक दर ठरवला जात नाही, तोपर्यंत ती शेतकऱ्यांना मान्य होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यात शेतकरी संघटनांकडून ऊसाची वाहतूक अडवण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्यावाहनांच्या टायरीतील हवा सोडून देत आहेत. वाहनांची जाळपोळ सुद्धा केली जात आहे. जर कारखानदारांनी जबरदस्तीने कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची अवस्था काय होईल हे गेल्या दोन दिवसांपासून दिसलं असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 

ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करा, किसान सभेची मागणी 

दरम्यान, अखिल भारतीय किसान सभा आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांना निवेदन देऊन ऊस दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. वाढलेला उत्पादन खर्च आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचा उतारा पाहता रुपये 4000 प्रति टन इतकी मागणी करण्यात आली.

मागील वर्षीच्या ऊसाला रुपये 200 अंतिम हप्ता देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केली जाणारी सर्व प्रकारचे कपात रद्द करण्यात यावी, ऊस वाहतुकीचा अवाजवी खर्च कमी करण्यात यावा, तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण ताबडतोब थांबवावे, साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  शिष्टमंडळात डॉ.उदय नारकर,ॲड. अमोल नाईक, कॉम्रेड नारायण गायकवाड, अप्पा परीट, विकास पाटील, दिनकर आदमापुरे, विनायक डंके, दिलीप कांबळे, सुमित पवार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget