एक्स्प्लोर

Sugar Factory : ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी, राज्याबाहेर ऊस पाठवण्यावर घातलेली बंदी उठवली

Kolhapur News : आम्हाला जो जास्त दर देईल त्यालाच ऊस देणार असल्याचं शेतकरी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं.

कोल्हापूर: राज्यातील ऊस परराज्यात घालवण्यावर घातलेली बंदी आता राज्य सरकारने उठवली आहे. सहकार मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane farmers)  दिलासा मिळाला आहे. 

यंदाच्या मोसमात राज्यातील ऊसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या निर्णयाने शेतकऱ्यां सुद्धा कोंडी होणार होती. त्यामुळे या निर्णयावरून सरकार आणि शेतकरी संघटना आमनेसामने आल्या होत्या. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. 

का निर्णय घेतला होता? 

राज्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. यंदा जेमतेमच ऊस उत्पादनाची शक्यता असल्याने कारखानदारही चिंतेत होते. त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात कर्नाटकमधील कारखाने हे महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमाभागातील कारखान्यांकडून ऊसाची पळवापळवी शक्य होती. असं जर झालं तर राज्यातील साखर हंगाम 100 दिवसही चालणार नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता उस उत्पादकांना परराज्यात म्हणजे कर्नाटकात ऊस पाठवण्यास बंदी घालण्यात आली होती. 

आम्हाला जो जास्त दर देईल त्यालाच ऊस पुरवणार

कर्नाटक सरकारने ज्या कारखान्यांकडे डिसलरी आहे त्या कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जादा दर द्यावा व ज्यांच्याकडे डिसलरी नाही त्यांनी 150 रूपये जादा दर द्यावा, असा आदेश काढला. त्या आदेशाला बंगळूर उच्च न्यायालयाने योग्य ठरविले. महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? शेतकऱ्याला कायद्याने मिळणाऱ्या एफआरपीमध्ये तुकडे करण्याचे पाप राज्य सरकारने केले असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला होता. राज्य सरकारने भलेही कारखानदारांच्या कितीही दाढ्या कुरवाळल्या तरी आम्हाला जो कारखाना जास्त दर देईल त्यालाच आम्ही ऊस पुरविणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Mhada home Lottery: सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
Embed widget