एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिला गुलाल भाजपने उधळला; शिरोळ तालुक्यात 'या' ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध

कोल्हापूर जिल्ह्यात थेट सरपंच निवडीत पहिला गुलाल भाजपने उधळला आहे. शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी भाजपचे रावसाहेब रामू कोळी बिनविरोध निवडून आले.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात थेट सरपंच निवडीत पहिला गुलाल भाजपने उधळला आहे. शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी भाजपचे रावसाहेब रामू कोळी बिनविरोध निवडून आले. कोळी यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला. निवडीनंतर भाजप युवा मोर्चाकडून रावसाहेब कोळी व ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झालेल्या अभिजित रामचंद्र कोळी यांचा सत्कार करण्यात आला. 

जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election) 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात दिसून आला.

सरपंचदासाठी सर्वस्व पणाला

गावचे राजकारण हे स्थानिक तसेच गल्लीतील मुद्यांपासून ते बांधाला बांध लागून असल्यास त्यावरून सुद्धा होते. त्यामुळे भावनेचं राजकारण सर्वाधिक केलं जातं. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवत शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक चुरस करवीर आणि राधानगरी तालुक्यात आहे. करवीर तालुक्यात 53 ग्रामपंचयतींमध्ये 374 सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. राधानगरी तालुक्यात 66 ग्रामपंचायतींसाठी 385 अर्ज आले आहेत. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायती कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघात  विखुरल्या गेल्या आहेत.  

सरपंचपदासाठी अन्य तालुक्यातील काय स्थिती?

शाहूवाडी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील 50 तालुक्यातील 260 जणांनी अर्ज  दाखल केले आहेत. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज आहेत. शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज आहेत. गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 81 अर्ज दाखल आहेत. कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल झाले आहेत. आजरा तालुक्यात 36 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल आहेत. चंदगडमधील 40 ग्रामपंचायतींसाठी 170 अर्ज दाखल झाले आहेत. ( Kolhapur District Gram Panchayat Election)

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget