एक्स्प्लोर

Kolhapur Crime : टोळीयुद्ध भडकण्यापूर्वीच पाचगावमधील भुरटी गुंडगिरी पोलिसांनी वेळीच ठेचून काढण्याची गरज

ज्या पाचगावने खूनाच्या बदल्यात खून अशी मालिकाच पाहिली, दोन मातब्बर राजकीय नेत्यांच्या गटांच्या जीवघेण्या ईर्ष्येतून राडा पाहिला, टँकरचे राजकारण पाहिले, त्याच ठिकाणी पुन्हा गुंडगिरी फोफावू लागली आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहराच्या हद्दीवर असलेल्या ज्या पाचगावने खूनाच्या बदल्यात खून अशी मालिकाच पाहिली, जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकीय नेत्यांच्या गटांच्या जीवघेण्या ईर्ष्येतून राडा पाहिला, टँकरचे राजकारण पाहिले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा गुंडगिरी फोफावू लागली आहे. यामुळे या भुरट्यांना हवेत उडू न देता वेळीच नांगी ठेचण्याची गरज आहे. कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध चांगलेच फोफावले आहे. त्यामुळे पाचगावात रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.

मंगळवारी रात्री पाचगाव हद्दीतील (Pachgaon Crime) गिरगावच्या खडीला असणाऱ्या हाॅटेलमध्ये कुख्यात डीजेचा मुलगा सुजित जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नंगानाच करत हाॅटेल मालकासह त्यांच्या मुलाला मारहाण केली. हाॅटेल कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. या गंभीर प्रकारानंतर हाॅटेल मालक विक्रमसिंह प्रभाकर क्षत्रिय (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण करतानाच पाचगाव आमच्या मालकीचं आहे, हाॅटेल कसं चालवतोस तेच बघतो, रोज येऊन तोडफोड करणार इतक्यापर्यंत जाऊन धमकीही दिली. यापूर्वीही एक दोनवेळा डीजेच्या मुलाकडून विक्रमसिंह यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. डीजेला अशोक पाटील खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या पाचगावमधील राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटातील11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे.13 फेब्रुवारी 2013 रोजी भरदिवसा न्यू महाद्वार रोडवर अ‍ॅक्सिस बँकेच्या दारात अशोक पाटील हा सिगारेट ओढत मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांनी पाटील यांच्या डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता. या खुनामुळे सुडाने पेटलेल्या पाटील गटाने खुनाचा बदला खून म्हणून आरोपी दिलीप जाधवचा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा 13 डिसेंबर 2013 रोजी पाचगावमध्ये सपासप वार करून खून केला होता.

त्यामुळे खूनाच्या बदल्यात खून पाडल्यानंतर पाचगाव गेल्या काही वर्षांपासून शांत आहे. मात्र, ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना? अशी शंका या उर्मट भाषेतून येऊ लागली आहे. पाचगाव हे अत्यंत संवेदनशील म्हणून पोलिसांच्या कायमच रडारवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाचगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गावची निवडणूक शांततेत पार पडली होती. त्यामुळे शांतता अबाधित राहण्यासाठी या प्रवृतीला वेळीच आवर घालण्याची गरज आहे. 

पाचगावचा प्रचंड वेगाने विस्तार

कोल्हापूरच्या तीन दिशांच्या तुलनेत दक्षिणेकडे गेल्या काही दिवसांपासून वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दीवर असलेल्या पाचगावचा अति प्रचंड वेगाने विकास झाला आहे. पाचगावच्या शेवटच्या टोकापासून ते गिरगावच्या हद्दीपर्यंत असलेली मोकळी जागाही भरून चालली आहे. त्यामुळे जमिनींच्या व्यवहारातून अनेकजण विनासायास गब्बर होऊन गेले आहेत. त्यामुळे सावकारी करणारे सुद्धा तयार झाले आहेत. सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत.   

पाचगावमध्ये आज शांतता दिसत असली, तरी पाचगावमध्ये वर्चस्वासाठी आसूसलेल्यांकडून सातत्याने बॅनरबाजी होत असते. त्यामुळे याकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या टोळ्या सक्रीय होण्यापूर्वीच यांचा नायनाट करण्याची गरज आहे. पाचगावमधील व्यावसायिक हाॅटेलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चांगलीच दहशत पसरली आहे. पाचगाव आणि कंदलगावच्या परिसरात अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. त्यामुळे या भागातील शांतता आणि गावातील टोळीयुद्ध पुन्हा भडकू न देणे हे पोलिसांनी आव्हान म्हणून स्वीकारावे लागेल. अनेक मालिकांचे शूटिंगही या भागात होत असते.   

कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; गुन्ह्यांची उकल होण्यातही निराशा

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. 2022 मध्ये सशस्त्र दरोड्याच्या 110 प्रकरणांची नोंद झाली. तथापि, आतापर्यंत फक्त 66 प्रकरणांचा उलघडा झाला आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्याचे प्रमाण केवळ 29 टक्के आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ले इत्यादी प्रमुख गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा शोध 100 टक्के आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत पकडण्याचे प्रमाण 99 टक्के आहे. महिलांवरील 563 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2021मध्ये 528 गुन्हे नोंदवले गेले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Embed widget