एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरातील पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना पूरस्थितीच्या सूक्ष्म नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या बैठकीत दिला.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत रेखावार यांनी निर्देश दिले. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करु नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

रेखावार म्हणाले की, "येत्या 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक असेल." पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल, तर येत्या शुक्रवारी होणाऱ्यात बैठकीत तहसिलदारांनी त्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. डोंगरी तालुक्यात भागामध्ये वीज कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेता 'दामिनी ॲपद्वारे' संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, "पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयामध्ये पूरबाधित नागरिकांसाठी बफर स्टॉक स्वरुपात औषधसाठा असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठा हे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावे. नागरिक व पशुधन सुरक्षित राहण्यासाठी नियोजन करावे."

लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोटची पूर्व चाचणी करावी

"पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. तसेच आपत्ती संदर्भातील व्हॉटस्ॲप किंवा ई-मेलवरुन जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी," अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

या आढावा बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांच्यासह आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, महावितरणसह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष तर पूरबाधित तालुक्यातील तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी हे व्हिडिओ काॅन्फरन्स माध्यमातून या बैठकीसाठी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली

व्हिडीओ

Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget