एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरातील पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना पूरस्थितीच्या सूक्ष्म नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या बैठकीत दिला.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत रेखावार यांनी निर्देश दिले. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करु नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

रेखावार म्हणाले की, "येत्या 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक असेल." पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल, तर येत्या शुक्रवारी होणाऱ्यात बैठकीत तहसिलदारांनी त्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. डोंगरी तालुक्यात भागामध्ये वीज कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेता 'दामिनी ॲपद्वारे' संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, "पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयामध्ये पूरबाधित नागरिकांसाठी बफर स्टॉक स्वरुपात औषधसाठा असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठा हे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावे. नागरिक व पशुधन सुरक्षित राहण्यासाठी नियोजन करावे."

लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोटची पूर्व चाचणी करावी

"पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. तसेच आपत्ती संदर्भातील व्हॉटस्ॲप किंवा ई-मेलवरुन जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी," अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

या आढावा बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांच्यासह आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, महावितरणसह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष तर पूरबाधित तालुक्यातील तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी हे व्हिडिओ काॅन्फरन्स माध्यमातून या बैठकीसाठी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan: अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Kolhapur : चौकात चल तुला दाखवतो! नगरसेवकांची भाषा, शड्डू मारत एकमेकांना बघून घेण्याची भाषा; कोल्हापूर महापालिका की कुस्तीचा आखाडा?
चौकात चल तुला दाखवतो! नगरसेवकांची भाषा, शड्डू मारत एकमेकांना बघून घेण्याची भाषा; कोल्हापूर महापालिका की कुस्तीचा आखाडा?
Rajesh Kshirsagar: अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर तुम्हाला टांगून ठेवलं जाईल; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सुनावलं
अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर...; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सज्जड दम देत सुनावलं
गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार, धनंजय महाडिकांना विश्वास, म्हणाले, सतेज पाटलांसोबत एकत्र...
गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार, धनंजय महाडिकांना विश्वास, म्हणाले, सतेज पाटलांसोबत एकत्र...

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडत नाही..' मनोज जरांगेंची प्रसाल लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाल लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं
पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
Embed widget