एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूरच्या विकासासाठी मोठे उद्योग आणा; उद्योजकांचे उद्योग मंत्री उदय सामतांना साकडे 

उद्योग विस्तार आणि विकास होण्यासाठी मोठे उद्योग कोल्हापुरात आणावेत अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

Kolhapur News: कोल्हापूरची उद्योग परंपरा स्वातंत्रपूर्व काळापासून आहे. अनेक सूक्ष्म,लहान व मध्यम उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत.  परंतु मोठे उद्योग नसल्याने उद्योग विस्तार व विकास ज्याप्रमाणात होणे आवश्यक होता, त्या प्रमाणात झाला नाही. अनेक समस्यांचा सामना करत उद्योग कसेबसे सुरू आहेत. उद्योग विस्तार आणि विकास होण्यासाठी मोठे उद्योग कोल्हापुरात आणावेत अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. तसेच यासाठी पूर्ण क्षमतेने विमानसेवा, कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा सकाळी आणि रात्री सुरू करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या उद्योग विस्तारासाठी मोठे उद्योग आणण्याचे नक्कीच प्रयत्न करू, विमानसेवाही पूर्ण क्षमतेने सुरू करू. विमानसेवा सुरू झाल्यास उद्योजकांना निर्यातीसही चालना मिळेल यात शंका नाही. मंजूर नविन एमआयडीसी आणि प्रस्तावित एमआयडीसीबाबत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे भविष्यात कोल्हापूर मोठे उद्योग येण्यास संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.  यावेळी ललित गांधी, दिनेश बुधले, सोहन शिरगावकर, संजय शेटे, दीपक चोरगे, हरिशचंद्र धोत्रे, प्रदीपभाई कापडिया, क्रिडाईचे संदीप मिरजकर, प्रदीप व्हरांबळे, औद्योगिक व व्यापारी संस्थचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘स्मॉल स्केल’साठी नव्या एमआयडीसीमध्ये 15 टक्के जागा राखीव

दुसरीकडे, उद्योगविस्ताराच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला गती देण्याचे काम राज्य सरकारचा उद्योग विभाग करत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये पुढील सहा महिन्यांत नव्या एमआयडीसींची उभारणी करून उद्योगविस्ताराला बळ दिले जाईल. या एमआयडीसींमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी 15 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात केली आहे. सामंत म्हणाले की, मागील सरकारने कोल्हापुरातील एमआयडीसींकडे दुर्लक्ष केले. आम्ही या एमआयडीसींमधील पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींचा निधी दिला आहे. 

रोजगार मेळाव्यात 532 उमेदवारांची प्राथमिक तर 14 उमेदवारांची अंतिम निवड

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय कार्यक्रमातील रोजगार मेळाव्यात 532 उमेदवारांची प्राथमिक फेरीत तर 14 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये 1829  रिक्त पदांसाठी 16 कंपन्या सहभागी झाल्या. या मेळाव्यात 791 उमेदवारांनी मुलाखती दिल्यानंतर 546 उमेदवारांची प्राथमिक व अंतिम निवड झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special ReportBaba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special ReportRaj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special ReportManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Embed widget