Ambabai : पुरातत्त्व विभागाकडूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन होणार; 'राज्य पुरातत्त्व'कडून पाहणी
Kolhapur News : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाली आहे. राज्य पुरातत्व विभागाकडून त्याबाबत मंगळवारी (28 फेब्रवारी) पाहणी करण्यात आली.

Kolhapur News : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाली आहे. राज्य पुरातत्व विभागाकडून त्याबाबत मंगळवारी (28 फेब्रवारी) पाहणी करण्यात आली. याबाबतची माहिती घेऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय पुरातत्व विभागातील रासायनिक संवर्धन प्रक्रिया विभागातील अधिकारी लवकरच पाहणी करुन संवर्धनाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आज देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे. राहुल रेखावार यांनी सांगितले की, "मूर्तीच्या (Ambabai) संवर्धनासाठी पुन्हा मागणी होऊ लागल्यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाणे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सद्यस्थितीबाबत माहिती दिली. त्यानुसार आता पुढील कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्याला मूर्तीची पाहणी करुन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शकपणे करावी
दरम्यान, मूर्तीच्या संवर्धनाबाबत अजिबात चालढलक नको. मूर्तीची झीज तात्काळ थांबवण्यासाठी संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शकपणे करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी रेखावार यांना देण्यात आले. संवर्धनाबाबत तात्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने अंबाबाई विकास आराखड्यासाठी ऐंशी कोटींच्या निधीची घोषणा केली; प्रत्यक्षात आठ कोटींचाच निधी आला. मंदिर परिसरातील विकासकामे आणि रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवताना या क्षेत्रातील जाणकारांना विश्वासात घेतले जावे, असेही जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत बिडकर, दत्ताजी टिपुगडे, गोविंद वाघमारे, कमलाकर जगदाळे, रुपेश रोडे, विनायक केसरकर, राजू जाधव, अभिजित बुकशेठ, प्रवीण पालव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
अंबाबाईच्या मूर्तीची नवरात्रोत्सवापूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया
नवरात्रोत्सवापूर्वी मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली, त्यावेळी ती घाईगडबडीने केली गेली. याबाबत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना भेटल्यानंतर त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रक्रियेबाबतची माहिती अगोदर भाविकांना दिली गेली नाही, असा आक्षेपही यावेळी व्यक्त झाला. त्यानंतर संबंधित कामावेळी तात्काळ संवर्धन करणे आवश्यक होते; मात्र ती नियमानुसारच पार पडल्याचे रेखावार यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















