एक्स्प्लोर

Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार, एक्झिट पोलचा अंदाज

झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे.

JharkhandExitPoll: झारखंडमध्ये निवडणुकीत काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार व्यक्त केला आहे. एबीपी न्यूज सी व्होटर, टाइम्स नाऊ आणि इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया यांच्या सर्व्हेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण  81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपला 28 जागा  टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 44 जागा मिळू शकतात तर भाजपला  28 जागांवर विजय मिळू शकतो. इतरांना सहा जागा तर  झारखंड विकास मोर्चाला तीन जागा मिळू शकतात , असा अंदाज आहे. AJSU ला आपले खाते उघडता येणार नाही, असा अंदाज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये देखील काँग्रेस आघाडीकडेच सत्तेची चावी राहणार असल्याचा अंदाज होईल.  इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला 43 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या खात्यात 27 जागा जाण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार मागील निवडणुकीतील आकड्यांपेक्षा दहा जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार  भाजप - 32 काँग्रेस+ - 35 झारखंड विकास मोर्चा- 03 ऑल झारखंड स्टुडंट युनियन - 05 इतर - 06 भाजप यावेळी राज्यात एकट्याने मैदानात उतरली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला दहा आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच या आघाडीमध्येच असलेल्या  आरजेडीच्या खात्यात दोन जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी एकत्रित निवडणूक लढत आहेत. हेही वाचा - Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता 2014 मध्ये कुणी किती जागा जिंकल्या होत्या ? 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने ३७ जागा जिंकत  ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन (AJSU) सोबत सरकार स्थापन केलं होतं.  AJSU ने पाच जागा जिंकल्या होत्या. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चाच्या आठमधील सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6 आणि इतर पक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या. 2014 च्या तुलनेत भाजपला पाच जागांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर जेव्हीएमला देखील पाच जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  AJSU ला मात्र आपल्या पाच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मागील वेळी सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला चार आणि जेएमएमला चार जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे. कसा झाला आहे हा सर्व्हे? या सर्व्हेसाठी झारखंड विधानसभेच्या सर्व  81 जागांवर एक्झिट पोळ घेण्यात आला होता. या अंतर्गत 405 पोलिंग बूथवर अभ्यास सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी जवळपास  37,000 लोकांशी संवाद केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
Horoscope Today 30 March 2026: मार्चचा शेवट 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने लवकरच सुख पदरात, आजचे राशीभविष्य
मार्चचा शेवट 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने लवकरच सुख पदरात, आजचे राशीभविष्य
अशोक खरातला भर चौकात फाशी द्यावी अशीच रुपालीताईंचीही मागणी राहणार, उमेश पाटलांचं वक्तव्य 
अशोक खरातला भर चौकात फाशी द्यावी अशीच रुपालीताईंचीही मागणी राहणार, उमेश पाटलांचं वक्तव्य 
पुण्यातील वाफगावमध्ये जमिनीचा ताब्या घेण्यावरुन महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, घटनेचे व्हिडिओ समोर 
पुण्यातील वाफगावमध्ये जमिनीचा ताब्या घेण्यावरुन महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, घटनेचे व्हिडिओ समोर 

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget