एक्स्प्लोर

Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार, एक्झिट पोलचा अंदाज

झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे.

JharkhandExitPoll: झारखंडमध्ये निवडणुकीत काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार व्यक्त केला आहे. एबीपी न्यूज सी व्होटर, टाइम्स नाऊ आणि इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया यांच्या सर्व्हेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण  81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपला 28 जागा  टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 44 जागा मिळू शकतात तर भाजपला  28 जागांवर विजय मिळू शकतो. इतरांना सहा जागा तर  झारखंड विकास मोर्चाला तीन जागा मिळू शकतात , असा अंदाज आहे. AJSU ला आपले खाते उघडता येणार नाही, असा अंदाज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये देखील काँग्रेस आघाडीकडेच सत्तेची चावी राहणार असल्याचा अंदाज होईल.  इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला 43 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या खात्यात 27 जागा जाण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार मागील निवडणुकीतील आकड्यांपेक्षा दहा जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार  भाजप - 32 काँग्रेस+ - 35 झारखंड विकास मोर्चा- 03 ऑल झारखंड स्टुडंट युनियन - 05 इतर - 06 भाजप यावेळी राज्यात एकट्याने मैदानात उतरली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला दहा आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच या आघाडीमध्येच असलेल्या  आरजेडीच्या खात्यात दोन जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी एकत्रित निवडणूक लढत आहेत. हेही वाचा - Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता 2014 मध्ये कुणी किती जागा जिंकल्या होत्या ? 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने ३७ जागा जिंकत  ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन (AJSU) सोबत सरकार स्थापन केलं होतं.  AJSU ने पाच जागा जिंकल्या होत्या. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चाच्या आठमधील सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6 आणि इतर पक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या. 2014 च्या तुलनेत भाजपला पाच जागांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर जेव्हीएमला देखील पाच जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  AJSU ला मात्र आपल्या पाच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मागील वेळी सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला चार आणि जेएमएमला चार जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे. कसा झाला आहे हा सर्व्हे? या सर्व्हेसाठी झारखंड विधानसभेच्या सर्व  81 जागांवर एक्झिट पोळ घेण्यात आला होता. या अंतर्गत 405 पोलिंग बूथवर अभ्यास सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी जवळपास  37,000 लोकांशी संवाद केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget