Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला, गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, तर इतर 5 जखमी
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मृतांचा आकडा वाढला असून यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात मृतांमध्ये डोबिंवलीचे तीन, पुण्याचे दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशातच पुण्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राज्यातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर गेला आहे. परिणामी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 26 निष्पाप लोकांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पूलावामा हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील अधिक पर्यटक हे महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील असल्याचे बोलले जात आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सुबोध पाटील हे जखमी झाले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दिलीप दिसले हे निसर्ग पर्यटन कंपनीकडून कश्मिर येथे गेले होते. यात पनवेल, उरण आणि ठाणे येथील 39 पर्यटकांचा समावेश होता. तर यातील सर्वाधिक पनवेलमधील पर्यटक असल्याची माहिती आहे. तर जखमी मधील सुबोध पाटील यांच्यावर कश्मिर येथे उपचार सुरू आहेत. मात्र काश्मीर खोऱ्यात पूलावामा हल्ल्यानंतर या सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात असताना मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता बाळावली आहे.
महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
मृतांची नावे
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3 ) हेमंत जोशी - डोंबिवली
4)संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले - पनवेल
जखामिनीची नावे
1) एस बालचंद्रू,
2) सुबोध पाटील
3)शोबीत पटेल
4) सिमरन रुपचंदानी- नागपूर
पर्यटकांसाठी एअर इंडियाकडून अतिरिक्त विमानांची घोषणा
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर घरी परतणाऱ्या पर्यटकांसाठी एअर इंडियाकडून श्रीनगरहून परतण्यासाठी अतिरिक्त विमानांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सकाळी 11.30 येथून श्रीनगर ते दिल्ली तर दुपारी 12 वाजता - श्रीनगर ते मुंबई अशी विमान सेवा असणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया बुधवार, 23 एप्रिल रोजी श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहे. श्रीनगरला जाणारी आणि श्रीनगरहून येणारी आमची इतर सर्व उड्डाणे वेळापत्रकानुसार सुरू राहतील. या क्षेत्रांमध्ये 30 एप्रिल 2025 पर्यंत कन्फर्म बुकिंग असलेल्या प्रवाशांना एअर इंडिया मोफत रीशेड्युलिंग आणि रद्द केल्यास पूर्ण परतफेड देखील देत असल्याची घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. तर अधिक मदतीसाठी, कृपया ०११ ६९३२९३३३, ०११ ६९३२९९९९ या क्रमांकावर आमच्या संपर्क केंद्राशी संपर्क साधा.असेही आवाहन करण्यात आले आहे.
दोन्ही उड्डाणांची माहिती खालीलप्रमाणे :
श्रीनगर ते दिल्ली - सकाळी ११:३०
श्रीनगर ते मुंबई - दुपारी १२:००
या उड्डाणांसाठी बुकिंग आता सुरू आहे.
हे ही वाचा
























