एक्स्प्लोर

Jalgaon News: सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ, काम मिळत नसल्याने बंगाली सुवर्ण कारागिरांची घरवापसी

Jalgaon Gold News: मागील दोन ते तीन वर्षात दागिने तयार करण्यासाठी आलेले नविन तंत्रज्ञान तसेच भाववाढीमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.

जळगाव:  सोन्याच्या किमतीत मोठी (Gold Price Hike) वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आता विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. परिणामी सोन्याला मागणी नसल्याने सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कामगारांना काम मिळत नाही. जळगावातील 50 टक्के बंगाली कारागिरांनी रोजगाराअभावी घरवापसी  केल्याचे  समोर आले आहे

 सोन्याच्या वाढत्या महागाईमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा गुंतवणुकीकडे कल वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. शुद्ध सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगाव शहराला 'सुवर्ण नगरी' म्हणून  ओळखले जाते. शुध्द सोन्यासह दागिन्यांच्या नवीनतम श्रृखंलेसाठीही जळगावच्या सराफ बाजाराची देशभर ख्याती होती. जळगावात सुमारे 20 ते 22 हजार बंगाली कारागीर दागिने बनवतात. मात्र, मागील दोन ते तीन वर्षात दागिने तयार करण्यासाठी आलेले नविन तंत्रज्ञान तसेच भाववाढीमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. यामुळे या बंगाली कारागिरांच्या हाताला काम मिळत नसल्याने सुमारे 50 टक्के कुशल बंगाली कारागिरांनी रोजगार अभावी घरवापसी केली आहे. तर उर्वरीत सहा ते सात हजार कारागीर देखील जळगाव सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती असल्याने सोने व्यवसाय करणाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत

जळगावच्या शुद्ध सोन्याचा नावलौकिक जगभर पसरला आहे. त्यामुळेच येथे राज्यभरातूनच नव्हे तर देश-परदेशातून ग्राहक सोने घेण्यासाठी येतात. विश्वासार्हता, सचोटी आणि सोन्याच्या दागिन्यांमधील विविधता जळगाव सुवर्ण बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. सुमारे 165 वर्षांपेक्षा जास्तचा इतिहास असलेला तब्बल एक हजार कोटींहून अधिकची वार्षिक उलाढाल असलेला जळगावचा सराफ बाजार आहे.

दागिने घडविण्यासाठी हजारो बंगाली कारागीर

अस्सल सोन्यासह दागिन्यांच्या डिझाइनमधील विविधता ही देखील जळगावच्या सुवर्ण बाजराची जमेची बाजू होती. यासाठी बंगालहून मागील 25 वर्षांपासून जळगावात अनेक बंगाली कारागीर आपल्या हातांनी सोन्याचे दागिने घडवतात.  गोलाणी मार्केट, सराफ बाजार, बालाजी पेठ या भागात सुमोर 25 हजारावर बंगाली कारागीर 15 ते 17 तास काम करुन जळगावातील मोठ्या सुवर्णपेढ्यांसाठी दागिने घडवित असत.

तीन वर्षात कारागिरांची संख्या कमी

मागील तीन ते चार वर्षात सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव, शासनाची नविन कर प्रणाली, दागिन्यांऐवजी सोन्याची चीप, बिस्किटाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. तसेच तंत्रज्ञानामुळे मोठ्या शहरातून येणाऱ्या तयार दागिन्यांमुळे या कारागिरांना मिळणारे 80 टक्क्यांना कमी झाले आहे. मागील तीन वर्षात जळगावातील 15 हजारावर बंगाली कारागीर आपल्या गावी परतले आहेत. सोन्यावर कलाकुसर करणारे त्यांचे कुशल हात आता शेतात राबू लागले आहेत.

सोन्याची भाववाढ, जीएसटीचा प्रभाव

सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची मानसिकता, व्यवसायात झालेले यांत्रिकीकरण, तसेच फॉर्मिंगच्या कमी किमतीच्या दागिन्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. मुंबई, राजकोटवरुन रेडीमेड दागिने घेण्याकडे व्यावसायिकांचा कल जळगावातील होलसेल मार्केट घटले.

जळगावात गेल्या 28 वर्षापूर्वी सोन्याचे दागिने घडविण्यासाठी आलो होतो. माझ्यासोबत जळगावात विविध ठिकाणी 20 हजारावर कारागीर होते. मात्र, मागील काही वर्षात सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने काम मिळणे अवघड झाले. त्यामुळे बहुसंख्य कारागीर आता घरी परतले आहेत. येथे राहण्याचा खर्च तसेच घरी पाठविण्यासाठी लागणार पैसे याचे गणित जुळत नसल्याने आता जवळपास सात हजार कारागीर देखील घरी जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे  कारगीर अजित दिलई म्हणाले. 

सोन्याचे भाव एकदम वाढल्याने सोन्याचे खरेदी कमी झाली आहे.  त्याचबरोबर जळगाव सोन्यासाठी प्रसिध्द असल्याने काही वर्षांपूर्वी जळगावात सोन्याचा होलसेल व्यापार देखील मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे येथूनच दागिने तयार केले जायचे. मात्र, आता होलसेल व्यापार कमी झाला आहे. तसेच मुंबईवरुन मालाची आवक होत असल्याने बंगाली कारागिरांचे काम कमी झाले. मात्र आमच्या कामगारांना कायम काम राहवे आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहे. तसेच आमचे सुवर्ण कारागीर कायम असल्याचं बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी म्हटले आहे

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget