Indurikar Maharaj Daughter Marriage: पैसा कुठून आला ते मुलाची भेट...इंदुरीकर महाराजांचं लग्नातल्या टीकेला थेट उत्तर, मनातलं सगळं बोलले!
Indurikar Maharaj Daughter Marriage: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला.

Indurikar Maharaj Daughter Marriage: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल (Indurikar Maharaj Daughter Marriage) यांच्याशी झाला. या शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. आता मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी लग्नात भाषण करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. (Indurikar Maharaj Daughter Marriage)
मुलीच्या जशी साखरपुड्याची चर्चा काही काळ चालली, तशीच या विवाहाची चर्चा आता दीर्घकाळ चालेल. ज्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, त्यांनी आपल्या मुलांच्या विवाहात आनंदाने खर्च करावा, अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली. पाहुण्यांसाठी पारंपरिक, सात्विक जेवणाची (गुलाबजाम आणि मट्ठा यांसारख्या काही मिठाईंशिवाय) व्यवस्था केली होती, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. (Indurikar Maharaj Daughter Marriage)
माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला- इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Daughter Marriage)
लग्नात मी मठ्ठा , गुलाबजाम केले नाही. लग्नामध्ये मराठमोळं आणि सात्विक जेवन होतं. आज मुलगा, मुलगी मोठी झाले ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती, माझी आणि माझ्या मुलाची देखील तीन वर्षे झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो, एक रुपया घेत नाही. शाळेत 13 शिक्षक आहेत, लग्नानंतर आता प्रश्न विचारला जाईल एवढा पैसा कुठून आला? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणाऱ्याने दिला, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही, असं इंदुरीकर महाराजांनी सांगितले.
नकारात्मकतेपेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष घ्यावं- इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Daughter Marriage)
एक हटयुग आणि ज्ञानयोग...असे दोन योग...नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाही. आनंदाने, सामुहिकतेने आणि सात्विक विचारांनी झालेला हा विवाह आहे.टीका करणाऱ्यांनी नकारात्मकतेपेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष घ्यावं, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
लेकीच्या लग्न खर्चांवरुन ट्रोलर्सना सुनावलं, इंदुरीकरांचं भर लग्नातलं भाषण, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या






















