एक्स्प्लोर

आता लेखी प्रश्न विचारता येणार, विरोधानंतर सरकारकडून अंशत: स्वरुपात प्रश्नोत्तराचा तास बहाल

संसदेचं पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर आता अंशत: स्वरुपात प्रश्नोत्तराचा तास बहाल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : 14 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशानादरम्यान प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यासांरख्या विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत जोरदार विरोध दर्शवला होता. विरोधकांच्या या विरोधाचा परिणाम झाला आहे. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या माहितीनुसार या निर्णयात बदल करण्यात आला आहे. दोन्ही सभागृहात आता सदस्यांना अतारांकित म्हणजेच लेखी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अतारांकित किंवा लेखी प्रश्न असे असतात, ज्यांची उत्तर सदस्यांना लेखीच द्यावी लागतात. या प्रश्नांची तोंडी उत्तरं दिली जात नाहीत. असे प्रश्न विचारण्यासाठी सदस्यांना 15 दिवस आधी नोटीस द्यावी लागते, पण यावेळी या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. सदस्यांना सांगितलं आहे की, "अशा प्रश्नांची नोटीस 4 सप्टेंबरपर्यंत द्यावी, ज्यांची लेखी उत्तरं सभागृहात 14 , 15 आणि 16 सप्टेंबर रोजी दिली जातील."

विरोधानंतर सरकारचं पाऊल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्येक सदस्याला आपल्या प्रश्नाची नोटीस ऑनलाईन पाठवण्यास सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारपासून सरकारने लेखी प्रश्नोत्तर बहाल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमच्या विरोधानंतर सरकारकडून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्षांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "सरकार लेखी प्रश्नोत्तरासाठी तयार आहे. मात्र सरकारी सूत्रांच्या दाव्यानुसार, प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा निर्णय सर्व पक्षांसोबत चर्चा करुनच घेण्यात आला होता.

टीएमसीचा विरोध प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याच्या निर्णयानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला. "कोरोना महामारीच्या बहाण्याने सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं. तर एबीपी न्यूजशी बोलताना लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंधोपाध्याय म्हणाले की, "हे सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे आणि यावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा व्हायला हवी होती."

अधीर रंजन चौधरी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्षाचे अर्थात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पत्र लिहून प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहर स्थगित न करण्याची मागणी केली होती. प्रश्नोत्तराच्या काळात खासदारांना सरकारला प्रश्न विचारण्याची संधी मिळते, ज्यावरुन सरकारचं उत्तरदायित्व निश्चित होतं, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
Embed widget