एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
National Flag : भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी स्वीकारण्यात आला? काय आहे राष्ट्रध्वजाची नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती
National Flag Of India : जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत. मात्र, भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो. हाच राष्ट्रध्वज फडकविण्याच्या काही नियमावली आहेत.
![National Flag : भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी स्वीकारण्यात आला? काय आहे राष्ट्रध्वजाची नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती When was national flag of India adopted What is National Flag Regulations Know insight details marathi news National Flag : भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी स्वीकारण्यात आला? काय आहे राष्ट्रध्वजाची नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/04/e5df5507ad70013681e199733a73e9431659613972_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
National Flag Of India
National Flag Of India : भारतीय राष्ट्रध्वज (National Flag Of India) हा 22 जुलै 1947 रोजी, भारत (India) देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी स्वीकारण्यात आला. आपला राष्ट्रध्वज केवळ शांतता आणि बंधुभावासाठी वर्तमान भारताचे प्राधान्य दर्शवत नाही, तर भारतीय संस्कृतीचा महान वारसा देखील जगासमोर ठेवतो. जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत. मात्र, भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो. हाच राष्ट्रध्वज फडकविण्याच्या काही नियमावली आहेत.
राष्ट्रध्वज फडकविण्याची नियमावली :
- भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण आणि अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश होता.
- संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक आणि मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातो. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.
- संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे आणि आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो. ध्वज फडकविताना आणि उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा आणि तिरपा फडकविताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. यामध्ये ध्वज फडकविताना प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.
- राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकविला गेला पाहिजे की, मान्यवरांचे तोंड हे उपस्थितांकडे पाहिजे आणि ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. किंवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे आणि भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे. पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा आणि त्यावर फडकवावा.
- संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
- राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती आणि पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
- ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कपडे घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
- केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत उभे पाहिजेत.सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- National Flag: राष्ट्रध्वजामधील रंगांचं महत्व काय? जाणून घ्या राष्ट्रध्वजाची रचना आणि त्याच्या आकाराबाबत
- PM Narendra Modi : इतिहासात आजचा दिवस विशेष महत्त्वाचा, 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन
- India : इतिहासात आजचा दिवस खास; 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिरंग्याचा स्वीकार; काय आहे इतिहास?
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion