एक्स्प्लोर

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय?

एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता.

मुंबई : एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता. एक्झिट पोल कसा असतो? प्रत्येक निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तुम्ही एक्झिट पोल पाहत असाल. मात्र मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोल नेमका कसा केला जातो, एक्झिट पोल म्हणजे काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक्झिट पोल मतदानाच्या दिवशीच केला जातो. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेतलेली असते, त्यानुसार ठराविक मतदार केंद्र निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने मतदान करुन येणारा पंधरावा माणूस, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचं विश्लेषण करुन आकडेवारी निश्चित करतात. #ABPEXITPOLL -  गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी! प्रत्येक मतदारसंघातलं कोणतं मतदान केंद्र निवडायचं हे सांख्यिकी पद्धतीनेच (सॅम्पल सिलेक्शन) ठरवलं जातं. मतदान करुन आल्यानंतर तुमच्यावर पहिला अर्धा तास प्रभाव कायम असतो की, तुम्ही कुणाला मतदान केलंय. त्यामुळे तिथे खरं उत्तर दिलं जातं, याला मानसशास्त्रीय आधार असल्याचं मानलं जातं. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये फरक काय? मतदानापूर्वी सादर केला जातो तो ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते, तर मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचणीला एक्झिट पोल म्हणतात. मतदानापूर्वी विविध मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांकडून प्रश्नावली भरुन घेऊन त्यांचा कल जाणून घेतला जातो, त्याला ओपिनियन पोल म्हणतात. ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण तो मतदानापूर्वी घेतला जातो. तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो. भारतातला पहिला एक्झिट पोल कसा झाला होता? भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात आला. याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केलं होतं. एका ठराविक वारंवारतेने येणाऱ्या ठराविक मतदाराला सांगितलं जायचं, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारुन घेतला जायचा. अगोदर ज्याला मतदान केलं, त्यालाच इथेही करा असं सांगितलं जायचं. अशा पद्धतीने पहिला एक्झिट पोल केला गेला. देशातील आघाडीचे निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांचा पहिल्या एक्झिट पोलमध्ये मोलाचा वाटा होता. संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी

हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget