एक्स्प्लोर

काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करुया, इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये इम्रान खांनी यांनी काश्मीरसह भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर बातचित करण्याची विनंती केली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये इम्रान खांनी यांनी काश्मीरसह भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर बातचित करण्याची विनंती केली आहे. इम्रान खांनी यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. खान यांनी पत्रात म्हटले आहे. की दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये चर्चा व्हायला हवी. काश्मीरसह दोन्ही देशांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपण चर्चेसाठी पुढे यायला हवे. इम्रान खांन यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांसमोरील आव्हाने, दक्षिण आशियामध्ये शांती प्रस्थापित करणे यासाठी भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होणे एकमेव उपाय आहे. दोन्ही देशांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. काश्मीरसह भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन होत आहे. पाकच्या सीमेवर सातत्याने नापाक कुरापती सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान मोदींना चर्चेचे आवाहन करत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद मधील दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून एअर जैशच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget