एक्स्प्लोर

BSP in Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात बसपाचा हत्ती 'बसला'; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी

BSP in Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत बसपाने आतापर्यंतची वाईट कामगिरी केली आहे.

BSP Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. 

उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मागील मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणातून बसपा मुख्य पटलावरून अदृष्य राहिले असल्याचे दिसून आले. बसपा प्रमुख मायावती यादेखील प्रचारात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. त्यामुळे बसपाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा होती. 

आधीची कामगिरी कशी होती?

बसपाने उत्तर प्रदेशच्या 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाने 164 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 67 जागांवर विजयी झाले होते. त्यावेळी समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशाच्या सरकारमध्ये होते. मात्र, मुलायमसिंह यादव आणि काशीराम यांच्यात झालेल्या वादामुळे बसपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बसपाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. या बसपा-भाजपच्या सरकारमध्ये मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या. पुढे मायावती यांनी भाजपसोबतची आघाडी मोडली. 

त्यानंतर 1996 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बसपाने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर, 2002 च्या निवडणुकीत त्यांनी 401 जागांवर निवडणूक लढवून 98 जागांवर विजय मिळवला होता. 2007 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने 206 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. मायावती यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाला फक्त 80 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेत बसपाला मोठा फटका बसला. बसपाला अवघ्या 19 जागांवर विजय मिळवता आला. 

काशीरांम यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती (DS4)ही संघटना 1981 मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर पुढे 1984 काशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. बसपाने आपल्या स्थापनेनंतर सुरुवातीला पराभव नंतर दखल आणि तिसऱ्या वेळेस विजय असे सूत्र काशीराम यांनी मांडले होते. त्यानुसार बसपाने काही निवडणुका लढवल्या. काशीरामदेखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. काशीराम यांनी 1988 मध्ये व्ही. पी. सिंह आणि 1989 मध्ये राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीकांत भोसले
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget