एक्स्प्लोर

आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा

“कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे चालण्या-फिरण्यास त्रास होत आहे. याच कारणास्तव मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. झांसीच्या जनतेने जे प्रेम आणि स्नेह दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांची सदैव ऋणी राहिन.” असं उमा भारती यांनी यावेळी सांगितलं.

झांसी/ मध्य प्रदेश : केंद्रीय मंत्री उमा भारतींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसह कोणतीही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीची धावपळ सहन होत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. माध्यमांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या की, “कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे चालण्या-फिरण्यास त्रास होत आहे. याच कारणास्तव मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. झांसीच्या जनतेने जे प्रेम आणि स्नेह दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांची सदैव ऋणी राहिन.” त्या पुढे म्हणाल्या की, “लोकसभेत भाजपचे दोन खासदार होते, तेव्हापासून आत्तापर्यंत पक्षासाठी काम केलं, आणि पुढेही करत राहिन. पण आता शरीर साथ देत नाही आहे. मात्र, सध्या भाजप हा देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झाल्याचा आनंद आहे.” विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी बोलताना आपण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच विजय होईल, आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमा भारती यांनी झांसी मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. उमा भारतींचा अल्प परिचय उमा भारतींचा जन्म 3 मे 1959 रोजी मध्य प्रदेशमधील टीकमगढ जिल्ह्यात झाला. साध्वी ऋतम्भरा यांच्यासोबत राम मंदिर आंदोलात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांच्यांकडे मनुष्यबळ विकास, पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती होती. 2003 ची विधानसभा निवडणूक मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक उमा भारतींच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत, त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ऑगस्ट 2004 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे गंगा स्वच्छता मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण काही काळानंतर त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं. सध्या त्यांच्याकडे केवळ स्वच्छता आणि पेयजल खातं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज
Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज "जय जय महाराष्ट्र"चा नारा घुमणार
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा तडाखा
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा तडाखा
Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
Sunetra Pawar Beed: अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
MIM Corporator : सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
Aaple Sarkar Portal Down: 'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज
Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज "जय जय महाराष्ट्र"चा नारा घुमणार
Embed widget