एक्स्प्लोर

School Re-opening: दिल्लीसह बिहार, गुजरात आणि केरळमधील शाळा आजपासून सुरू, निर्बंध केले शिथील

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक राज्यात निर्बंध शिथील केले आहेत. आजपासून बिहार, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.  

School Re-opening: कोरोना रुग्णांची संख्या देशात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथील होत आहेत. आजपासून दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, जीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीबरोबर अन्य काही राज्यांमध्ये देखील आजपासून शाळा सुरू होणार आहेत. यामध्ये बिहार, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमधील शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
बिहार 

बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, राज्य सरकारने रविवारी शाळा पुन्हा सुरू करण्याचा आणि रात्रीचा कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच इतर अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर, नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, सोमवारपासून आठवीपर्यंतच्या वर्गांना 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर नववीच्या पुढील वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) चैतन्य प्रसाद यांनी सांगातिसले की, 6 जानेवारीपासून लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू, जो रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू होता, तोही उठवला जात आहे. सिनेमा हॉल, जिम, मॉल्स आणि स्विमिंग पूल यांनाही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी असेल. दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्याच्या नियमातूनही सूट देण्यात आली आहे. तथापी, सर्व आस्थापनांना कोविड प्रतिबंधाशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे लागणार आहे. विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कारांना 50 ऐवजी 200 लोक उपस्थित राहू शकतात. ही मार्गदर्शक तत्त्वे 7 फेब्रुवारीपासून लागू होतील जी 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर कोविड परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. 


गुजरातमध्ये पहिली ते नववीपर्यंत शाळा सुरू होणार 

कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे गुजरात सरकारने 7 फेब्रुवारीपासून इयत्ता 1 ली ते 9 वी च्या शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कोविड-19 ची परिस्थिती पाहता सरकारी, खासगी आणि अनुदानीत शाळा सोमवारपासून इयत्ता 1 ते 9 पर्यंतचे ऑफलाईन अभ्यास पुन्हा सुरू करू शकतात. मात्र, ऑफलाईन शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही माध्यम निवडू शकतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढल्यानंतर या वर्गांसाठी ऑफलाईन अभ्यास स्थगित करण्यात आला होता. 

केरळमध्ये 10 वी ते 12 वी चे वर्ग सुरू होणार 

केरळमध्ये कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे, राज्य सरकारने 7 फेब्रुवारीपासून इयत्ता 10 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात , 7 फेब्रुवारीपासून 10 वी, 11वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. तर इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या मुलांसाठी आणि बालवाडीतील मुलांसाठी 14 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होतील. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्येही आजपासून इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे.  त्यानुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता 7 फेब्रुवारीपासून प्रत्येक परिसर प्राथमिकपासून मुलांसाठी खुला असेल. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण सत्र आयोजित केले जाईल.  दरम्यान, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी देखील आजपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 14 फेब्रुवारीपासून नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget