एक्स्प्लोर

Kavitha Kalvakuntla : 'तेलंगणा विकास मॉडेल'ची किर्ती सर्वदूर, विधानसभा निवडणुकीत हाच महत्त्वाचा मुद्दा; के कविता यांचं ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान

Telangana Development Model : आगामी विधानसभा निवडणुकीत 'तेलंगणा विकास मॉडेल' हाच पक्षाचा मुख्य मुद्दा असेल आणि पक्ष यापुढे सर्वसमावेशक विकास करेल, असं कलवकुंतला कविता यांनी म्हटलं आहे.

ऑक्सफोर्ड, ब्रिटन : ऑक्सफर्ड विद्यापीठातील (Oxford University) एका कार्यक्रमात भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या कलवकुंतला कविता यांनी हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीत 'तेलंगणा विकास मॉडेल' महत्त्वाचा मुद्दा असेल, असं कविता यांनी सांगितलं. तेलंगणाच्या सर्वसमावेशक विकासाच्या मॉडेलने समृद्धी आणली आहे आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत हाच पक्षाचा मुख्य मुद्दा असेल आणि पक्ष यापुढे सर्वसमावेशक विकास करेल. तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानात

जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात 'सर्चिंग फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ : द तेलंगणा मॉडेल' या व्याख्यानासाठी भारत राष्ट्र समिती (BRS) विधानपरिषदेला आमंत्रित करण्यात आलं होतं. यानिमित्ताने BRS नेत्या कलवकुंतला कविता यांनी ऑक्सफर्ड  विद्यापिठात सोमवारी संध्याकाळी व्याख्यान दिलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानात कविता कालवकुंतला यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या दूरदर्शी 'सर्वसमावेशक विकास : तेलंगणा मॉडेलचा शोध' या नमुन्याबाबत मार्गदर्शन केलं.

'तेलंगणा विकास मॉडेल'ची किर्ती सर्वदूर

तेलंगणा मॉडेल हे संतुलित विकासाचे प्रतीक आहे, कल्याणकारी वाढीसह पायाभूत सुविधांच्या प्रगतीला बारकाईने जोडलेले आहे, असं त्यांनी म्हटलं. 'मला विश्वास आहे की, आपल्या मातृभूमीच्या भारताच्या, आपल्या भारत मातेच्या अपरिहार्य उदयात, केसीआर (KCR) सारख्या सच्च्या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली, जे तेलंगणाचे शिल्पकार आहेत, आपण आपल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात समृद्ध भविष्य घडवू." असं कविता यांनी म्हटलं आहे.

तेलंगणा मॉडेल कसं आहे?

'तेलंगणा मॉडेल' हे एक समृद्ध मॉडेल आहे, ज्यामुळे तेलंगणातील लोकांचे जीवन उच्च स्तरावर नेण्यास मदत झाली आहे, असं कविता यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, तेलंगणा राज्यात तळागाळातील सर्व क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक विकास झाला आहे. हा आमचा मुख्य मुद्दा आहे, ज्यासह आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. तेलंगणातील जनतेने गेल्या दोन टर्ममध्ये पक्षाला त्यांचे "आशीर्वाद" दिले आहेत आणि या काळात पक्ष त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कलवकुंतला कविता यांनी यांनी तेलंगणाच्या पार्श्‍वभूमीवर संकट आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा केली. मूलभूत तत्त्वे नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे, मुक्त उद्योगाची संस्कृती वाढवणे आणि संपत्तीचे समान वितरण सुनिश्चित करणे, आर्थिक व्यावहारिकता आणि प्रशासन यांचा संगम तेलंगणा मॉडेलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कृषी पुनरुज्जीवनाकडे तेलंगणाचा दृष्टीकोन, TS-iPass सारख्या उपक्रमांद्वारे औद्योगिक सुविधा आणि नाविन्यपूर्णतेवर भरीव फोकस हे राज्याच्या वाढत्या आर्थिक आणि त्यासोबत सामाजिक विकासाला कारणीभूत ठरल्याचं कविता यांनी सांगितलं तेलंगणाच्या कृषी पुनर्जागरणाची कथा, भात उत्पादनात लक्षणीय वाढ आणि शेतकर्‍यांसाठी आधारभूत फ्रेमवर्क विशेषतः अधोरेखित केलं गेलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Embed widget