एक्स्प्लोर

'मेक इन इंडिया' आता 'जोक इन इंडिया' झाला; तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका 

K Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली.

नांदेड : देशाच्या स्वातंत्र्यानंतर 16 वर्षे भाजपची (BJP) आणि उर्वरित काळात काँग्रेसची (Congress) सत्ता होती. दोन्ही पक्षांनी देशासाठी काय केलं? देशातील या परिस्थितीला भाजप आणि काँग्रेस जबाबदार आहेत. सरकार फक्त भाषणबाजीत वेळ घालवत आहे. कोणाला अंबानी तर कोणाला अदानी पाहिजे. मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K Chandrasekhar Rao ) यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली आहे. नांदेडमधील जाहीर सभेत ते बोलत होते. 

"दिवाळीचे दिवे, तिरंगा, लायटिंग, रंग हे सर्व चीनमधून येत आहे. हे सर्व भारतात कसे येत आहे? भारतात चायना बाजार कसा लागतो? भारत बाजार का लागत नाही? असा प्रश्न उपस्थित करत के. चंद्रशेखर राव यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. "देशात सध्या फक्त मन की बात, इसकी बात, उसकी बात यावरच भाषण सुरू आहे. त्यामुळेच देशातील बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन BRS पार्टीचे विस्तारीकरण करत आहोत. देशातील विचारधारा बदलण्याची गरज आहे. देशातील जनतेने अनेक आमदार, मंत्री बनवले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी देखील अनेक भागात आज देखील वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत. हे पाहून फार दुःख होतंय, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या. 

 "शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. देशाला धान्य, जीवनदान देणारा शेतकरी आत्महत्या करत आहे हे सर्व दुःखद आहे. देशातील शेतकऱ्यांच्या शेतात धान्य उगवण्याच्या जागी मृत शेतकऱ्यांचे मृतदेह  उगवत आहेत. महाराष्ट्र अनेक नद्या आहेत तरी देखील मराठवाड्यात पाणी नाही. देशातील कृषियोग्य भूमी 41 कोटी एकर आहे. या सर्व शेतात पाणी जायला हवं. समुद्रात जाणारं पाणी शेतात यायला पाहिजे. परंतु, सरकार यावर काहीच काम करत नाही. त्यामुळं या सरकारवर आपण विश्वास करू शकत नाही, असा टोला के. चंद्रशेखरराव यांनी यावेळी लगावला. 

के. चंद्रशेखर राव म्हणाले, " विविध रंगांचे झेंडे आणि धर्मावर जनतेला वेगळे केले जात आहे. देशात 16 करोड शेतकरी आहेत. शेतकरी आणि कामगार मिळून या देशातील सत्ता सहज मिळू शकते. दिव्याला दिवा लावून आपण पुढे जाऊ. भारत बुद्धिजीवी देश आहे, बुद्धुंचा देश नाही. आता ही सत्ता हटवण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना आता लेखणी घेऊन कायदा बनवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अबकी बार किसान सरकार हा नारा आम्ही दिलाय. देशात कोणताही पक्ष  जिंकतो पण जनता हारते. भारत हा गरीब देश नाही.

आपला देश अमेरिकेपेक्षा श्रीमंत आहे. भारतात संपत्ती आहे, पण त्यापासून जनता वंचित आहे. या देशात पाणी, कोळसा, जमीन असं सगळं आहे. अमेरिका, चीन हे आपल्या देशापेक्षा मोठे आहेत पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन फार कमी आहे. हे सर्व आकडे माझे नाहीत तर हे सरकारचे आकडे आहेत. पावसाळ्यात देशात 1 लाख हजार TMC पाऊस होतो, पण त्याचा योग्य वापर होत नाही. जवळपास 50 हजार TMC पाणी सरळ समुद्रात जाते. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे."  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Bhiwandi Election 2026: भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Bhiwandi Election 2026: भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
Pune News: बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
IND vs NZ ODI Series : 147, 124, 113, 108… आकडे बोलतायत, पाच सामन्यात 4 शतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे बंद; देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
147, 124, 113, 108… आकडे बोलतायत, पाच सामन्यात 4 शतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे बंद; देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
BMC Election 2026: जागावाटपात शिवसेना-भाजपने खिजगणतीतही धरलं नाही, मुंबईत रिपाईचे 13 उमेदवार स्बळावर, तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारसभेला का गेले?
जागावाटपात शिवसेना-भाजपने खिजगणतीतही धरलं नाही, मुंबईत रिपाईचे 13 उमेदवार स्बळावर, तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारसभेला का गेले?
Pune Crime Prashant Jagtap: सादिक शेख यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी पाठवलेलं पत्र वाचताच प्रशांत जगताप हळहळले, म्हणाले थोडं आधी....
सादिक शेख यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी पाठवलेलं पत्र वाचताच प्रशांत जगताप हळहळले, म्हणाले थोडं आधी....
Embed widget