एक्स्प्लोर

'मेक इन इंडिया' आता 'जोक इन इंडिया' झाला; तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका 

K Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली.

नांदेड : देशाच्या स्वातंत्र्यानंतर 16 वर्षे भाजपची (BJP) आणि उर्वरित काळात काँग्रेसची (Congress) सत्ता होती. दोन्ही पक्षांनी देशासाठी काय केलं? देशातील या परिस्थितीला भाजप आणि काँग्रेस जबाबदार आहेत. सरकार फक्त भाषणबाजीत वेळ घालवत आहे. कोणाला अंबानी तर कोणाला अदानी पाहिजे. मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K Chandrasekhar Rao ) यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली आहे. नांदेडमधील जाहीर सभेत ते बोलत होते. 

"दिवाळीचे दिवे, तिरंगा, लायटिंग, रंग हे सर्व चीनमधून येत आहे. हे सर्व भारतात कसे येत आहे? भारतात चायना बाजार कसा लागतो? भारत बाजार का लागत नाही? असा प्रश्न उपस्थित करत के. चंद्रशेखर राव यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. "देशात सध्या फक्त मन की बात, इसकी बात, उसकी बात यावरच भाषण सुरू आहे. त्यामुळेच देशातील बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन BRS पार्टीचे विस्तारीकरण करत आहोत. देशातील विचारधारा बदलण्याची गरज आहे. देशातील जनतेने अनेक आमदार, मंत्री बनवले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी देखील अनेक भागात आज देखील वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत. हे पाहून फार दुःख होतंय, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या. 

 "शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. देशाला धान्य, जीवनदान देणारा शेतकरी आत्महत्या करत आहे हे सर्व दुःखद आहे. देशातील शेतकऱ्यांच्या शेतात धान्य उगवण्याच्या जागी मृत शेतकऱ्यांचे मृतदेह  उगवत आहेत. महाराष्ट्र अनेक नद्या आहेत तरी देखील मराठवाड्यात पाणी नाही. देशातील कृषियोग्य भूमी 41 कोटी एकर आहे. या सर्व शेतात पाणी जायला हवं. समुद्रात जाणारं पाणी शेतात यायला पाहिजे. परंतु, सरकार यावर काहीच काम करत नाही. त्यामुळं या सरकारवर आपण विश्वास करू शकत नाही, असा टोला के. चंद्रशेखरराव यांनी यावेळी लगावला. 

के. चंद्रशेखर राव म्हणाले, " विविध रंगांचे झेंडे आणि धर्मावर जनतेला वेगळे केले जात आहे. देशात 16 करोड शेतकरी आहेत. शेतकरी आणि कामगार मिळून या देशातील सत्ता सहज मिळू शकते. दिव्याला दिवा लावून आपण पुढे जाऊ. भारत बुद्धिजीवी देश आहे, बुद्धुंचा देश नाही. आता ही सत्ता हटवण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना आता लेखणी घेऊन कायदा बनवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अबकी बार किसान सरकार हा नारा आम्ही दिलाय. देशात कोणताही पक्ष  जिंकतो पण जनता हारते. भारत हा गरीब देश नाही.

आपला देश अमेरिकेपेक्षा श्रीमंत आहे. भारतात संपत्ती आहे, पण त्यापासून जनता वंचित आहे. या देशात पाणी, कोळसा, जमीन असं सगळं आहे. अमेरिका, चीन हे आपल्या देशापेक्षा मोठे आहेत पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन फार कमी आहे. हे सर्व आकडे माझे नाहीत तर हे सरकारचे आकडे आहेत. पावसाळ्यात देशात 1 लाख हजार TMC पाऊस होतो, पण त्याचा योग्य वापर होत नाही. जवळपास 50 हजार TMC पाणी सरळ समुद्रात जाते. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे."  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Embed widget