एक्स्प्लोर

Target Killing : काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या, आतापर्यंत 24 हून अधिक जणांचा मृत्यू

Target Killing In Kashmir : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना समोर आली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची शनिवारी जम्मूमधील शोपियान परिसरात दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली.

Target Killing In Kashmir : काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची (Target Killing) घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी (Terrorist) एका काश्मिरी पंडिताची (Kashmirr Pandit Murder) गोळ्या झाडून हत्या केली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची शनिवारी जम्मूमधील शोपियान परिसरात दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात असंतोष पसरला आहे. काश्मिरी पंडितांकडून टार्गेट किलिंग विरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत.

काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची हत्या

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे. काश्मीर खोऱ्यातील शोपियान येथे ही घटना घडली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सफरचंदाच्या बागेत जात असताना दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट्ट यांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 24 जणांची हत्या

जम्मूतील काश्मिरी पंडितांना काश्मिरमध्ये जाण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे. या विरोधात काश्मिरी पंडितांकडून जम्मूमध्यो जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत. टार्गेट किंलिंग विरोधात काश्मिरी पंडित आक्रमक झाले आहेत. काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगबद्दल काश्मीरमधील लोकांमध्ये संताप आहे. काश्मीरी पंडितांकडून टार्गेट किलिंगविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. या वर्षात आतापर्यंत टार्गेट किलिंगमध्ये 24 जणांची हत्या झाली आहे.

सुरक्षेतील त्रुटी तपासल्या जातील : पोलीस 

पोलिस उपमहानिरीक्षकांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर एका दहशतवाद्याने गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. या क्लस्टरसाठी सुरक्षा व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तिथे सुरक्षारक्षक तैनात आहेत, मात्र तरी ही चूक कशी झाली याचाही शोध घेतला जात आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शोपियानचे पोलीस उपायुक्त सचिन कुमार वैश यांनी सांगितले की, भट्ट यांच्या पार्थिव जम्मू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Embed widget