एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी जनतेचं, कुठल्याही एका पक्षाचं नाही : पर्रिकर

नवी मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी भारतीय जनतेला जातं, कुणा एका राजकीय पक्षाला याचं श्रेय जात नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले. नवी मुंबईतील एका परिषदेच्या उद्घाटनादरम्यानच्या भाषणात पर्रिकर बोलत होते. "सध्या सर्जिकल स्ट्राईकच्या श्रेयावरुन वाद सुरु आहे. पण मला इथे आवर्जून सांगावासं वाटतं की, सर्जिकल स्ट्राईकचं संपूर्ण श्रेय देशातील 127 कोटी जनतेला जातं. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय जात नाही. मात्र, सर्जिकल स्ट्राईकच्या एकंदरीत निर्णय प्रक्रियेतील भाग म्हणून पंतप्रधान मोदी आणि मलाही यातलं थोडं श्रेय जातं.", असे संरक्षमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले. यावेळी, राजकारण आणि सैन्याची प्रकरणं यांची सरमिसळ करु नये, असे सांगताना पर्रिकर असेही म्हणाले की, लोकांचं सर्जिकल स्ट्राईकबाबत भावनिक प्रतिक्रिया समजू शकतो. "सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री झोपलोही नव्हतो" "लोकांमधील राग वाढताना दिसत होता. कारण शत्रू वारंवार हल्ले करत आहेत. लोकांमध्ये निराशेची भावना होती, लोक हताश होते. मात्र, सर्जिकल स्ट्राईकमुळे लोकांना एकप्रकारे समाधान मिळालंय. सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, सरकार निर्णय घेतं. सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री मी झोपलोही नव्हतो. प्रचंड तणाव होता.", असे पर्रिकर म्हणाले. "...तर संपूर्ण जबाबदारी सरकारवर आली असती" "सर्जिकल स्ट्राईकमध्ये कुठलीही चूक झाली असती तर पूर्ण जबाबदारी सरकारवर आली असती. त्यामुळे असे निर्णय घेण्यासाठी हिंमत असावी लागते. आमच्या मैत्रीला कमजोरी समजलं गेलं. आता ते गोंधळात आहेत. कारण भारताबद्दल अंदाजही लावू शकत नाहीत. शिवाय भविष्यात परत हिंमतही ते करु शकत नाहीत.", असे पर्रिकर म्हणाले. "29 सप्टेंबरसारखा सर्जिकल स्ट्राईक यापूर्वी झाला नव्हता" यूपीएच्या कार्यकाळात एलओसीपलिकडे सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या काँग्रेसच्या दाव्याचं खंडन करत पर्रिकर म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे यूपीएच्या काळात असं कोणतंही ऑपरेशन झालं नव्हतं. शिवाय, 29 सप्टेंबरसारखा सर्जिकल स्ट्राईक यापूर्वी कधीही झाला नव्हता. 29 सप्टेंबरचा सर्जिकल स्ट्राईक हा पूर्णपणे सरकारचा निर्णय होता."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.