एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिल्या आहेत. यासाठी कोर्टानं सरकारला तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. सिटीझन्स रिसोर्स अॅन्ड अॅक्शन इनिशिएटिव्ह (CRANTI) या स्वयंसेवी संस्थेने 2014 मध्ये याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी वेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे.एस. खेहर यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिली जाणारी मदत पुरेशी नाही. उलट आत्महत्येच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय योजण्याची गरज असल्याचं मत खंडपीठानं यावेळी व्यक्त केलं. विशेष म्हणजे, या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं गेल्याच महिन्यात केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसही पाठवली होती. CRANTI ने या याचिकेच्या माध्यमातून गुजरातमध्ये 2003 ते 2013 दरम्यान 619 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. तसेच या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत म्हणून देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत असल्याने,  यावर ठोस उपाय योजण्याची गरज असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्यावतीनं शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना, आणि इतर योजनांची माहिती न्यायालयाला देण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या गेल्या अनेक दशकांपासून जैसे थेच आहे. यावर ठोस उपाय योजण्यात कोणालाही यश आलं नाही. त्यामुळे सरकारचा यावर कोणती पावलं उचलत आहे? असा प्रश्न न्यायालयानं सरकारी वकीलांना विचारला. दरम्यान, आता या प्रकरणावर पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. एबीपी न्यूजशी बोलताना याचिकाकर्त्यांचे वकील कॉलिन गोंजाल्विस यांनी सांगितलं की, '' वास्तविक, सरकारजवळ कोणतीही उपाय योजना नाही. त्यामुळे सरकार आपल्या योजनांची माहिती देण्याचं काम करतंय. पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. त्यामुळेच न्यायालयाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. आता सरकारला गांभीर्यानं विचार करुन उत्तर देण्याची गरज आहे.''
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget