एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराची सुप्रीम कोर्टाकडून दखल; हायकोर्टाच्या निकालावर प्रश्न उपस्थित

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

Manipur Violence: ईशान्य भारतामधील राज्य मणिपूरमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचार प्रकरणी (Manipur Violence) सुप्रीम कोर्टात सुनावणी (Supreme Court) झाली. मणिपूर हायकोर्टाने मेईती समुदायाला आदिवासी प्रवर्गात दाखल करण्याबाबत राज्य सरकारला आदेश दिले. यावरही सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहे. उच्च न्यायालय अशा प्रकारचा आदेश कसा देऊ शकते, अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेतखालील खंडपीठाने मणिपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबतची माहिती रेकॉर्डवर घेतली. त्याशिवाय, हिंसाचारा दरम्यान, विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन आणि इतर उपाययोजनांबाबत आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. 

सुप्रीम कोर्टात मणिपूर सरकारने म्हटले की, याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येत आहे. राज्यात पुरेसं सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती आता सामान्य होत असून संचारबंदी आता काही तास शिथिल करण्यात आली आहे.

संचार बंदीत शिथिलता 

हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये आज सकाळी काही तासांसाठी संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. मणिपूरमधील काही अनेक ठिकाणी आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. संचारबंदीत काही तास शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. 

मणिपूरमध्ये आदिवासी-बिगर आदिवासी असा संघर्ष असा उफाळून आला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर, आसाम रायफल्सच्या जवानांनी फ्लॅग मार्च काढला होता. 

काय आहे प्रकरण?

बिगर आदिवासी मेईती समाजाला आदिवासींचा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू आहे. मणिपूर हायकोर्टाने मेईती समाजाला आदिवासी प्रवर्ग सामील करून घेण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी असे आदेश दिले.  या आदेशा विरोधात ‘ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर’तर्फे मागील बुधवारी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. मात्र, यादरम्यान हिंसाचार उसळला. नुकतेच मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीवर चार आठवड्यांत केंद्राकडे शिफारस पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला होता. 

हिंसाचारात 54 ठार 

मागील काही दिवसपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जण ठार झाले असल्याचे वृत्त पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, 54 मृतांमधील 16 मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयातीत शवागारात ठेवण्यात आले आहे. तर, 15 जणांचे मृतदेह इंफाळमधील जवाहरलाल नेहरू आयुर्विज्ञान संस्थानात ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय, इंफाळ पश्चिमच्या लाम्फेलमधील रुग्णालयात 23 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Instagram Influencer Death: इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोअर्स, पण वैयक्तिक आयुष्यात वादळ! इन्फ्लुएन्सर नागलक्ष्मींना पतीने संपवलं, चेन्नईतील घटनेनं खळबळ
इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोअर्स, पण वैयक्तिक आयुष्यात वादळ! इन्फ्लुएन्सर नागलक्ष्मींना पतीने संपवलं, चेन्नईतील घटनेनं खळबळ
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Pune Crime News: पुण्यातील कोंढव्याला म्हटले 'पाकिस्तानचे कराची'; भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोंढव्याला म्हटले 'पाकिस्तानचे कराची'; भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Parbhani Fire News: लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
Harbhajan Singh: गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Raj Thackeray: इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Embed widget