एक्स्प्लोर

Manipur Violence: आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासींमध्ये संघर्ष; मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा का पेटला? जाणून घ्या...

Manipur Violence: मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. जाणून घ्या त्यामागील कारणे...

Manipur Violence:  ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. राज्यात हिंसाचार इतका पेटला की सरकारने दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या झाडण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसापांसून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कर उतरले आहे. आसाम रायफल्स, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. काही ठिकाणी दंगलखोर आणि सुरक्षा दलाच्या जवानात चकमक झाल्याची माहिती आहे. 

प्रकरण नेमंक काय?

हायकोर्टाने 14 एप्रिल रोजी दिलेल्या निकालानंतर मणिपूरमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. मेईती समुदायाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने निकाल सुनावला. या समुदायाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून केंद्र सरकारला तशी शिफारस करावी असे आदेश हायकोर्टाने दिले. मेईती समुदायाने त्यांची परंपरा, संस्कृती आणि भाषा वाचवण्यासाठी मेईती समुदायाला आदिवासींचा दर्जा द्यावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. 

हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर सर्व आदिवासी समूह याच्याविरोधात रस्त्यावर उतरले. कुकी आणि नागा समुदायाने मेईती समुदायाचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध केला. 

मेईती समुदायाची संख्या किती?

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरमध्ये सर्वाधिक लोकसंख्या मेईती समुदायाची आहे. राज्यातील लोकसंख्येपैकी जवळपास 64.6 टक्के लोकसंख्या मेईती समुदायाशी निगडीत आहे. मात्र, हा समुदाय फक्त 10 टक्के क्षेत्रफळावर वास्तव्य करतो. तर, उर्वरित 90 टक्के भाग हा डोंगराळ आहे. या डोंगराळ भागातील राज्यातील इतर लोकसंख्येचे वास्तव्य आहे. याच ठिकाणी नागा, कूकीसह इतर आदिवासी समुदाय वास्तव्य करतात. हाच समुदाय मेईती समुदायाच्या विरोधात उतरला आहे. 

मेईती समुदायाची मागणी काय?

मेईती समुदायाने म्हटले की, त्यांच्याकडे वास्तव्य करण्यासाठी अतिशय कमी भूभाग आहे. सध्या असलेल्या ठिकाणची जागा अपुरी पडू लागली आहे. डोंगराळ भागातील लोकदेखील शहरी भागात येऊ लागली आहेत. त्यामुळे जमिनीचे दर वाढत आहेत. या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नाही. त्यामुळे मेईती समुदायाने आपल्यासाठी विशेष दर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. 

मणिपूरमधील कायद्यानुसार,  खोऱ्यात स्थायिक झालेले मेईती समुदायाचे लोक डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकत नाहीत किंवा जमीन खरेदी करू शकत नाहीत. पण डोंगराळ भागात स्थायिक झालेले कुकी आणि नागा आदिवासी समुदायही खोऱ्यात स्थायिक होऊन जमीन खरेदी करू शकतात.

मेईती समुदायाच्या मागणीला विरोध का?

मेईती समुदायाच्या मागणीला विरोध करणाऱ्या गटांचे म्हणणे आहे की, मेईती हा मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. हा समुदाय शहरी भागात असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. तर, डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागते. मेईती समुदायाने डोंगराळ भागात घुसखोरी केली असल्याचा आरोप करण्यात येतो. 

जमीन सर्वेक्षणाच्या मुद्यावर वादंग

मेईती समुदायाच्या मागणीला विरोध होत असताना दुसरीकडे राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणामुळे डोंगराळ भागातील आदिवासी समुदायात आणखी अंसतोष निर्माण केला. मणिपूर सरकारने गेल्या वर्षी जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत चुराचंदपूर आणि त्याच्या आसपासच्या भागांसाठी सर्वेक्षण करण्यात आले. कुकी समाजातील काही लोकांना ते राखीव असलेल्या वनक्षेत्रात वास्तव्य करत असल्याचे सांगत जागा सोडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागातील आदिवासींनी त्याचा विरोध केला. 

असा सुरू झाला हिंसाचार 

27 एप्रिल रोजी इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने सरकारच्या विरोधात 8 तासांचा बंद पुकारला होता. 28 एप्रिल रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या दौऱ्यापूर्वी चुरचंदपूरमध्ये हा बंद सुरू झाला. येथील ओपन जीमचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार होते. तत्पूर्वी बिरेन सिंग यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजला आग लावण्यात आली. त्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, त्यानंतर हा हिंसाचार थांबण्याऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये पसरला.

28 एप्रिल रोजी पोलिसांच्या तैनातीबरोबरच हिंसक निदर्शने वाढू लागली, लोक रस्त्यावर उतरले, टायर जाळले आणि प्रचंड तोडफोड केली. त्याच रात्री पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमकही झाली. पोलिसांनीही बळाचा वापर केला. यानंतर २९ एप्रिललाही मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती. रात्रभर अनेक इमारतींना आग लागली.

विद्यार्थी संघटनेच्या मोर्चामुळे हिंसाचार?

सुमारे तीन दिवस चाललेला हा संपूर्ण गोंधळ 30 एप्रिलपर्यंत आटोक्यात आला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या शंका, प्रश्नांबाबत लोकांमध्ये वणवा पेटला होता. त्याची ठिणगी पोलीस आणि प्रशासनाला दिसली नाही. 
मेईती समाजाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण अधिकच स्फोटक झाले. ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) या विद्यार्थी संघटनेने 3 मे रोजी मोर्चा काढला. मेईती समाजाच्या मागणीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारोंनी उपस्थिती दर्शवली. 

मणिपूरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने-मोर्चे काढण्यात आले. या दरम्यान हिंसाचार उफाळून आला. मोर्च्यांच्याविरोधात मेईती समुदाय देखील रस्त्यावर उतरला. त्यामुळे या संघर्षाला आदिवासी-बिगर आदिवासी अशी किनार मिळाली. राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराचा वणवा पेटला.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला

व्हिडीओ

Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
Embed widget