Soli Sorabjee Death: माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन
प्रख्यात वकील आणि देशाचे माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी (Soli Sorabjee) यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 आणि 1998 ते 2004 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते.
नवी दिल्ली: प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्याच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Former Attorney General of India, Soli Sorabjee passes away at the age of 91 years.
— ANI (@ANI) April 30, 2021
(File photo) pic.twitter.com/FB3ATuisz8
सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं आहे. त्यांचा जन्म 1930 साली मुंबईमध्ये झाला. 1953 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसला सुरुवात केली. सोली सोराबजी 1971 साली सर्वोच्च न्यायालयात सीनियर काऊन्सलिंग झाले. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1998 ते 2004 या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
Saddened by news that former Attorney General Soli Sorabjee has passed away after a recent bout of #Covid. A man of uncommon ability & integrity, he stood for principled public values. (And we shared a birthday.) A giant has departed. RIP Soli. https://t.co/9YWxqllI7J
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 30, 2021
सोली सोराबजी यांची ओळख देशातील एक प्रख्यात वकील अशी होती. त्यांची गणना जगातील मोठ्या मानवाधिकार वकिलांच्या यादीतही होत होती. नायजेरिया देशातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राने 1997 साली विशेष दूत म्हणून पाठवलं होतं.
सोली सोराबजी यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीनं त्यांचा पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Updates: देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर तर 3498 जणांचा मृत्यू
- 15 महिन्यांपासून काय करताय? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं
- Exit Poll Result 2021 : बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा अंदाज