एक्स्प्लोर

Sanjay Raut : मोदी शाह यांनी आणलेल्या विधेयकामुळं चंद्राबाबू नायडू-नितीशकुमार घाबरले, ते पाठिंबा काढतील अशी मोदी सरकारला भीती : संजय राऊत

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मोदी शाह यांनी आणलेल्या विधेयकामुळं चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार घाबरले असा टोला लगावला आहे. ते पाठिंबा काढतील अशी भीती मोदी सरकारला असल्याचंही राऊत म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गुन्ह्यामध्ये गंभीर आरोप झाल्यानंतर पदावरुन हटवण्यासंदर्भातील विधेयक अमित शाह यांनी लोकसभेत सादर केलं. काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षांनी याचा विरोध केला. काँग्रेसनं हे बिल विनाशकारी असल्याचं म्हटलं तर अमित शाह यांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधेयकातील प्रस्तावानुसार एखाद्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यावर गंभीर आरोप असतील आणि त्याला अटक झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास 31 व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल किंवा त्याला पदावरुन हटवण्यात येईल. विधेयकातील या तरतुदीवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी एक्स  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. 

संजय राऊत यांचं ट्विट काय? 

मोदी शाह यांनी नवं विधेयक मुख्यमंत्री आणि मंत्र्‍यांना अटक करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आणलं आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार घाबरले असल्याचं वृत्त आहे, ते पाठिंबा काढून घेतील अशी भीती मोदी सरकारला आहे.  


हे विधेयक पूर्णपणे विनाशकारी : मनीष तिवारी 

लोकसभेत अमित शाह यांनी विधेयक सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ केला. काँग्रेस, समाजवादी पार्टीसह विरोधी पक्षांनी गोंधळ केला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. अमित शाह यांनी म्हटलं की हे बिल संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाईल. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी हे विधेयक पूर्णपणे विनाशकारी असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, भारतीय संविधानानुसार कायद्याचं राज्य असलं पाहिजे, ज्याचा आधार हा आहे की जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात. या विधेयकात बदलाची अपेक्षा करतो. हे विधेयक एका यंत्रणेला पंतप्रधानांचा बॉस करते, असं देखील तिवारी म्हणाले. 

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या विधेयकाचा विरोध केला आहे. त्याशिवाय जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक 2025 आणि संविधानाच्या (130 व्या) विधेयक 2025 चा विरोध करत असल्याचं म्हटलं. हे विधेयक सरकार निवडण्याच्या अधिकाराला कमजोर करतं, असं ते म्हणाले. 

आम आदमी पार्टीनं देखील या विधेयकाचा विरोध केला आहे. इंडिया आघाडीचा घटकपक्ष नसलो तरी या विधेयकाचा विरोध करतोय, असं आपनं म्हटलं. आपचे नेते अनुराग ढांडा यांनी म्हटलं की केंद्र सरकार संसदेत जे विधेयक सादर करेल त्याचा विरोध आपकडून केला जातो. हे विधेयक हुकुमशाही लागू करण्याची पद्धत आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात यंत्रणांचा दुरुपयोग करते, कधी मंत्र्यांना अटक करते तर कधी दुसऱ्या पक्षांच्या मुख्यमंत्र्‍यांना अटक करते, असं ते म्हणाले.

संजय राऊत यांची पोस्ट :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget