एक्स्प्लोर

रोहिंग्या मुस्लिमांचं भारतात राहणं धोकादायक, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

रोहिंग्या शरणार्थींचं देशात राहणं बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारने याप्रकरणी 16 पानी उत्तर न्यायालयात सादर केलं आहे.

नवी दिल्ली : रोहिंग्या मुस्लीम शरणार्थींचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलं असून, यासंदर्भात केंद्र सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करताना रोहिंग्या शरणार्थींचं देशात राहणं बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारने याप्रकरणी 16 पानी उत्तर न्यायालयात सादर केलं आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, रोहिंग्या मुस्लीमांचं देशात राहणं बेकायदेशीर आहे. आम्ही यावर भारतीय घटनेतील अधिकारांचा दाखला देऊ शकतो, जे भारतीय नागरिकांना बहाल केले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांचं भारतात राहणं देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असल्यचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अस्तित्वाने भारतीयांच्या हक्कावरही गदा येऊ शकते. काही रोहिंग्या मुस्लीमांचा दहशतवादी गटाशी संबंध असल्याचंही केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही याप्रकरणी यावर सुनावणी करणं न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे की, नाही हे पाहावं लागणार असल्याचं स्पष्टं केलं. तसेच याप्रकरणी NHRC ला नोटीस देण्यासही नकार दिला आहे. कोण आहेत रोहिंग्या मुस्लीम? म्यानमारमध्ये बौद्ध धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे. पण एका आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये 10 लाख रोहिंग्या मुस्लीम आहेत. इ.स. 1400 च्या आसपास बर्मामधील अराकन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम येऊन राहिल्याचं बोललं जातं. त्यातील सर्वाधिक नागरिक 1430 मध्ये अराकानचा बौद्ध राजा नारामीखला राज्याच्या दरबारात काम करत होते. अराकान प्रांत म्यानमारच्या पश्चिमेला असून, या प्रांताला लागूनच बांगलादेशची सीमा आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? म्यानमारच्या रखाइन राज्यात लष्कर आणि रोहिंग्या उग्रवाद्यांशी संघर्ष सुरु आहे. यात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील मानवाधिकार संघटना म्यानमारमधील रोहिंग्यांवर अत्याचार सुरु असल्याचा आरोप होत आहे. आत्तापर्यंत 1 लाख 80 हजार रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात शरण घेतली आहे. तर भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लिमांनी शरण घेतली आहे. सध्या जम्मू-काश्मीर, हैदराबाद, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि राजस्थानमध्ये रोहिंग्या मुस्लीमांनी शरण घेतली आहे. रोहिंग्यांच्या शरणार्थींच्या वाढत्या संख्येमुळे देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. सुप्रीम कोर्टानेही याप्रकरणी केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. त्यावर उत्तर देताना, केंद्र सरकारने देशात बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. कारण, रोहिंग्या मुस्लीमांचा वापर करुन पाकिस्तानातील दहशतवादी संघटना देशात दहशत निर्माण करतील अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे रोहिंग्या मुस्लिमांच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्रानेही चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटारेस यांनी, याप्रकरणी लवकरच तोडगा काढणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच रोहिंग्या मुस्लिमांसाठी कायदा तयार करण्याचं आवाहन म्यानमान सरकारला केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vietnam Boat Capsize : व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली, 33 पर्यटकांचा जीव धोक्यात, काहीजणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली, 33 पर्यटकांचा जीव धोक्यात, काहीजणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Shahajad Bhatti News : सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget