एक्स्प्लोर

राज्यसभेच्या निवडणुकीत पळवापळवीचं राजकारण, तीन राज्यांमध्ये भाजपचं काँग्रेसपुढे आव्हान

राज्यसभेच्या 24 जागांसाठी येत्या 19 जूनला निवडणूक होते. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यांच्या पक्षबदलासोबत 22 आमदारांनी राजीनामा दिल्याचं नाट्य मार्चमध्येच घडलं होतं.

नवी दिल्ली : देशातील तीन राज्यांमध्ये सध्या राज्यभेच्या निवडणुकीवरुन जोरदार धुमशान सुरु आहे. आमदारांची पळवापळवी, रिसॉर्ट पॉलिटिक्स, पैशांचा बाजार हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला देशात कोरोना नावाचा प्राणघातक आजार अजून आहे की नाही याबद्दल थोडी शंका वाटू शकते. पण राजकारण्यांना त्याचं काही पडलेलं दिसत नाही. कुठल्या राज्यात कशी चुरस सुरु आहे, यावर एक नजर आहे.

राज्यसभेच्या 24 जागांसाठी येत्या 19 जूनला निवडणूक होते. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यांच्या पक्षबदलासोबत 22 आमदारांनी राजीनामा दिल्याचं नाट्य मार्चमध्येच घडलं होतं. त्यानंतर आता गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला आपले आमदार निवडणुकीआधी रिसॉर्टमध्ये ठेवण्याची वेळ आली.

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक झाली. ती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. किंबहुना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एक नैतिक दबावच सत्ताधाऱ्यांवर टाकला गेला. पण इतर राज्यांमध्ये मात्र ही स्थिती नाही. कोरोनाच्या ऐन संकटात होणाऱ्या या निवडणुकीत बिनबोभाट सगळं राजकारण सुरु आहे. आमदारांची पळवापळवी सुरु आहे. पैशांचा बाजार सुरु आहे.

प्रत्येक राज्यातली काय परिस्थिती आहे?

गुजरातमध्ये गेल्या पंधरा दिवसांत काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामे दिले. काँग्रेसला आपल्या दोन जागा जिंकण्यासाठी 68 मतांची गरज आहे. पण आता त्यांच्याकडे 65 आमदार उरलेत. तर भाजपनं तीन उमेदवार रिंगणात उतरवलेत. तिसरा उमेदवार आहे. काँग्रेसचेच माजी नेते नरहरी अमीन. त्यामुळे काँग्रेसच्या शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंह सोळंकी या दोनपैकी एका उमेदवाराचं भवितव्य धोक्यात आहे.

गुजरातमध्ये 2017 ची राज्यसभेची निवडणूकही देशपातळीवर गाजली होती. कारण तेव्हा काँग्रेसचे अहमद पटेल यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपनं बरेच प्रयत्न केले होते. तेव्हाही काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले. 9 जणांनी बाजूनं मतदान केलं नव्हतं. आाता याहीवेळा आपली ताकद टिकवण्यासाठी काँग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशानं गणितं बदलली आहेत. तीन पैकी दोन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि समरसिंह सोळंकी हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांची एकमेव सीट सीफ आहे, दुसरे उमेदवार फूलसिंह बरैय्या यांची उमेदवारी मात्र धोक्यात आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमध्ये तर भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले आहेत. राजस्थानमध्ये अजून प्रत्यक्षात ते घडलेलं नाही. पण भाजपनं एक जादा उमेदवार दिल्यानं काँग्रेसला राजस्थानातही आमदार फुटण्याची भीती वाटते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे के सी वेणूगोपाल आणि नीरज डांगी हे दोन उमेदवार आहेत. जर काही धोका झाली नाही तर काँग्रेसचे दोनही उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपनं राजेंद्र गहलोत यांची एक जागा निश्चित असतानाच ओंकार सिंह लाखावत यांच्या रुपानं अजून एक उमेदवार देऊन काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवली आहे.

राज्यसभेच्या या निवडणुकीनंतर भाजपचे 11 तर काँग्रेसचे 5 खासदार वाढण्याची शक्यता आहे. राज्यसभेत भाजपचे एकूण 86 तर काँग्रेसचे 44 खासदार होतील. महाराष्ट्राच्या 7 जागांसह देशातल्या एकूण 34 जागांसाठी राज्यसभेची निवडूणक बिनविरोध झाली. पण इतर ठिकाणी मात्र सत्तेचा खेळ चालू असल्यानं घोडेबाजाराला उत आला. कोरोना संकटातही हे राजकारण थांबू शकलेलं नाहीय हे दुर्दैव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget