एक्स्प्लोर

Rajasthan: पुलवामा शहिदांच्या पत्नींच्या आंदोलनावरुन 'राजकारण' सुरू, आंदोलकांना हटवलं

Rajasthan Pulwama Widow Protest : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या विधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलं होतं. त्यावरुन आता राजकारण होत असल्याचं दिसून येतंय. 

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या विधवांनी केलेल्या आंदोलनावरुन आता राजस्थानचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. या मुद्द्यावरुन राजस्थान सरकार आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात 10 दिवस निदर्शने करणाऱ्या तीन शहीदांच्या पत्नींना जयपूर पोलिसांनी आंदोलनस्थळावरुन हटवले असून त्यांना पाठिंबा देणारे भाजप खासदार किरोरी लाल मीणा यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या तीन जवानांच्या विधवा पत्नींनी 28 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु केलं आहे. अनुकंपा तत्वावर त्यांच्या नातेवाईकांसोबतच त्यांच्या मुलांनाही नोकऱ्या मिळाव्यात आणि इतर काही मागण्या त्यांनी केल्या आहेत.  

या घटनेनंतर राज्यातील भाजपने आक्रमक भूमिका घेत गेहलोत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या वतीनं शनिवारी मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जयपूरमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या घराबाहेर निदर्शने करत असताना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या पत्नींना पोलिसांनी त्या ठिकाणावरुन हटवलं आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. यावर भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून शहिदांचा हा अपमान असल्याचं सांगितलं आहे. 

 

सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला घरचा आहेर

पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, विधवांचे प्रश्न संवेदनशीलतेने ऐकले पाहिजेत. रस्ते बांधणे, घरे बांधणे, पुतळे बसवणे यासारख्या मागण्या आपण पूर्ण करू शकतो, यावर आजही माझा विश्वास आहे. शहिदांच्या विधवांच्या मागण्या ऐकायला आपण तयार नाही, असा संदेश जाऊ नये. त्यांचे मुद्दे आपल्याला मान्य असो वा नसो, पण त्यांच्या मागण्या ऐकताना आपण आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे.

 

अशोक गेहलोत यांचा खासदार मीनावर आरोप 

या विधवा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत आणि शहीदांच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या मुलांनाही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी नियमात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये त्यांच्या गावात रस्ते बांधणे आणि हुतात्म्यांचे पुतळे बसवणे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मीना यांच्यावर राजकीय फायद्यासाठी या गोष्टीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे खासदार मीना यांनी केला आहे. 



 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget