एक्स्प्लोर

मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हसत-हसत बोलत होते; राहुल गांधींनी पुन्हा साधला मोदींवर निशाणा

मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, राहुल गांधी म्हणाले.

Congress Leader Rahul Gandhi PC: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींनी (PM Modi) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिलेल्या उत्तरावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळतंय. मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. तसेच, मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी बोलताना म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संसदेत 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यापैकी शेवटच्या 2 मिनिटांत ते मणिपूरबद्दल बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत, मुलांना मारलं जात आहे. तर मोदी काल हसत बोलत होते, चेष्टा करत होते, हे त्यांना शोभा देत नाही. भारताचे पंतप्रधान आहेत, जर देशात हिंसा होत असेल तर पंतप्रधानांनी दोन तास थट्टा करु नये. विषय काँग्रेस नव्हता, राहुल गांधी नव्हता तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय आणि ते रोखलं का जात नाही? हा मुद्दा होता." 

मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली, असं का म्हणालो मी? राहुल गांधींचं स्पष्टीकरण 

राहुल गांधी म्हणाले की, "जे मी मणिपूरमध्ये पाहिले हे पहिलं घडलं नाही. मी संसदेत बोललो की, पंतप्रधान मोदी, शहांनी भारतमातेची हत्या केली. मणिपूरमध्ये भारताला संपवलं आहे. मी हे का बोललो? तर मी जेव्हा मणिपूरमध्ये पोहोचलो, जेव्हा तिथे दौरा केला. आम्ही मैतेई परिसरात गेलो, आम्हाला स्पष्ट सांगितलं की, तुमच्या सुरक्षेत जर कोणी कुकी असेल तर त्याला इथे आणू नका. कारण आम्ही त्याला मारुन टाकून. जेव्हा कुकी परिसरात गेलो आम्हाल सांगितलं की, सुरक्षेत जर कोणी मैतेई असेल तर त्याला इथे आणू नका त्याला गोळी झाडू. आम्हाला मैतेईना दूर ठेवावं लागलं आणि कुकीला दूर ठेवावं लागलं. आज मणिपूरचे दोन भाग झाले हे सत्य आहे. आज राज्याची हत्या केली आहे.  त्यामुळे मी म्हटलं की, मणिपूरमध्ये भारताची हत्या केली. 

"काल मी पंतप्रधान हसताना, थट्टा करताना पाहिलं तेव्हा भारताचे पंतप्रधान अशाप्रकारे कसं काय बोलू शकतात? पंतप्रधानांना आपल्या देशात काय सुरु आहे, हे माहित नाही? ते जाऊ शकत नाहीत त्याची कारणं आहे. जाऊ शकत नाही, तर मणिपूरबद्दल बोला तरी. मणिपूरमध्ये होतंय ते भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवू शकतं. पंतप्रधानांना मणिपूरला जळू द्यायचं आहे, शांत करायचं नाही.", असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget