एक्स्प्लोर

मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हसत-हसत बोलत होते; राहुल गांधींनी पुन्हा साधला मोदींवर निशाणा

मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, राहुल गांधी म्हणाले.

Congress Leader Rahul Gandhi PC: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींनी (PM Modi) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिलेल्या उत्तरावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळतंय. मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. तसेच, मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी बोलताना म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संसदेत 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यापैकी शेवटच्या 2 मिनिटांत ते मणिपूरबद्दल बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत, मुलांना मारलं जात आहे. तर मोदी काल हसत बोलत होते, चेष्टा करत होते, हे त्यांना शोभा देत नाही. भारताचे पंतप्रधान आहेत, जर देशात हिंसा होत असेल तर पंतप्रधानांनी दोन तास थट्टा करु नये. विषय काँग्रेस नव्हता, राहुल गांधी नव्हता तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय आणि ते रोखलं का जात नाही? हा मुद्दा होता." 

मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली, असं का म्हणालो मी? राहुल गांधींचं स्पष्टीकरण 

राहुल गांधी म्हणाले की, "जे मी मणिपूरमध्ये पाहिले हे पहिलं घडलं नाही. मी संसदेत बोललो की, पंतप्रधान मोदी, शहांनी भारतमातेची हत्या केली. मणिपूरमध्ये भारताला संपवलं आहे. मी हे का बोललो? तर मी जेव्हा मणिपूरमध्ये पोहोचलो, जेव्हा तिथे दौरा केला. आम्ही मैतेई परिसरात गेलो, आम्हाला स्पष्ट सांगितलं की, तुमच्या सुरक्षेत जर कोणी कुकी असेल तर त्याला इथे आणू नका. कारण आम्ही त्याला मारुन टाकून. जेव्हा कुकी परिसरात गेलो आम्हाल सांगितलं की, सुरक्षेत जर कोणी मैतेई असेल तर त्याला इथे आणू नका त्याला गोळी झाडू. आम्हाला मैतेईना दूर ठेवावं लागलं आणि कुकीला दूर ठेवावं लागलं. आज मणिपूरचे दोन भाग झाले हे सत्य आहे. आज राज्याची हत्या केली आहे.  त्यामुळे मी म्हटलं की, मणिपूरमध्ये भारताची हत्या केली. 

"काल मी पंतप्रधान हसताना, थट्टा करताना पाहिलं तेव्हा भारताचे पंतप्रधान अशाप्रकारे कसं काय बोलू शकतात? पंतप्रधानांना आपल्या देशात काय सुरु आहे, हे माहित नाही? ते जाऊ शकत नाहीत त्याची कारणं आहे. जाऊ शकत नाही, तर मणिपूरबद्दल बोला तरी. मणिपूरमध्ये होतंय ते भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवू शकतं. पंतप्रधानांना मणिपूरला जळू द्यायचं आहे, शांत करायचं नाही.", असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
Social Media Influencer Found Dead: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Embed widget