एक्स्प्लोर

67 दिवस, 15 राज्यांमधील 110 लोकसभा मतदारसंघांतून प्रवास; आजपासून राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात

Congress Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात. 67 दिवसांत 15 राज्यांमधील 110 लोकसभा मतदारसंघांतून प्रवास, मणिपूरमधून यात्रेला सुरूवात होणार

Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) रविवारी (14 जानेवारी) 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू करणार आहेत. हा प्रवास मणिपूरच्या (Manipur) थौबल जिल्ह्यातून (Thoubal District) सुरू होऊन मुंबईला (Mumbai News) पोहोचेल. या काळात राहुल गांधी 6 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे.

राहुल गांधी 60 ते 70 जणांसह पायी आणि काही ठिकाणी बसनं प्रवास करतील. दुपारी 12 वाजता मणिपूरमधील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून हा प्रवास सुरू होईल. दरम्यान, यापूर्वी मणिपूरची राजधानी इंफाळपासून (Imphal) सुरुवात होणार होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' रविवारपासून (14 जानेवारी) सुरू होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा इम्फाळपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. हा प्रवास थौबल जिल्ह्यातील खंगजोम येथून सुरू होईल. 66 दिवस चालणारी ही भारत जोडो न्याय यात्रा देशातील 15 राज्यांमधून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. 67व्या दिवशी यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल पत्रकार परिषदेला संबोधित करू शकतात.

खंगजोम वॉर मेमोरियल हे एक ऐतिहासिक स्मारक आहे, ज्याचं उद्घाटन 2016 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी काँग्रेस सरकारच्या काळात केलं होतं. 1891 मध्ये झालेल्या शेवटच्या अँग्लो-मणिपूर युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ हे ऐतिहासिक स्मारक बांधलं गेलं आहे.

काँग्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी रविवारी सकाळी 11 वाजता इंफाळला पोहोचतील आणि खोंगजोम वॉर मेमोरियलला भेट देतील. यानंतर प्रवासापूर्वी थोबलमध्ये बैठक होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या दुसऱ्या यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हिरवा झेंडा दाखवतील. या भेटीत इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) अनेक नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या अध्यक्षांना यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय इतरही अनेक सेलिब्रिटी या प्रवासात सहभागी होणार आहेत.

भारत जोडो न्याय यात्रेत 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांचा समावेश 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा देशातील 15 राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेत 110 जिल्हे, 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभा जागांचा समावेश असेल. या कालावधीत हा प्रवास 6713 किलोमीटरचा प्रवास करेल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रातील मुंबईत पोहोचेल. प्रवास इथेच संपेल. 

यात्रेचा हा प्रवास जनतेला न्याय मिळावा यासाठी : जयराम रमेश

यात्रेच्या एक दिवस आधी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ही यात्रा म्हणजे ध्रुवीकरणाचं राजकारण आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध काँग्रेसनं सुरू केलेला वैचारिक लढा आहे. हा निवडणूक प्रवास नसून राजकीय पक्षाचा वैचारिक प्रवास आहे. द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाविरोधात देशभरात प्रेम आणि एकोपा मागण्यासाठी भारत जोडो यात्रा होती. देशातील जनतेला न्याय मिळावा या मागणीसाठी आता न्याय यात्रा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget