एक्स्प्लोर

'15 लाखांच्या घोषणेचं काय झालं?', मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

'देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता.'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर दिलं. मात्र, यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. 15 लाखांच्या घोषणेचं काय झालं? अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. दुसरीकडे  मोदींनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'ज्यांनी कायम घराणेशाहीच केली त्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये.' अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ’ ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ?,  नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी...’  या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे : वल्लभभाई पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर... ‘इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता.' असं मोदी यावेळी म्हणाले. ...म्हणून तेव्हा देशाचा विकास झाला नाही 'सुरुवातीच्या काळात पंचायतपासून संसदेपर्यंत तुमच्याचा झेंडा होता. पण इतिहास विसरुन सर्व शक्ती फक्त एकाच कुटुंबाचं गुणगान गाऊ लागला. त्यामुळेच देशाचा विकास झाला नाही.' असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला. ‘तुम्ही केलेल्या विभाजनाची किंमत आजही देशाला चुकवावी लागते’ 'ज्यावेळी अटलबिहारी यांच्या सरकारने तीन राज्यांची निर्मिती केली होती. त्यावेळी ते निर्णय ऐतिहासिक होते. पण जेव्हा तुम्ही देशाचं विभाजन केलं. त्याची किंमत आजही देशाला चुकवावी लागत आहे. तुम्ही (काँग्रेस) देशाचे तुकडे केले?' अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ‘लोकशाही आमच्या रक्तात आहे’ 'नेहरु यांनी लोकशाही देशाला दिली. हे ऐकून मी हैराण झालो. लिच्छवी साम्राज्य आणि बौद्धाच्या वेळी लोकशाही सुरु होती. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरुंनी देशाला लोकशाही दिलेली नाही. खर्गे हे एका कुटुंबाची भक्ती करुन इथे बसले आहेत. पण तुम्ही जगतगुरु बसवेश्वर यांचं नाव घेण्यास विसरु नका. लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आपली परंपरा आहे.' असा टोलाही मोदींनी हाणला. ‘आम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही’ 'आम्ही जे काम हातात घेतो ते पूर्ण करण्याचं प्रयत्नही करतो. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही. मागील सरकारने केलेल्या चुका आम्ही आता निस्तारत आहोत. सत्ता येते आणि जाते पण देश कायम राहतो.' असंही मोदी यावेळी म्हणाले. ‘काँग्रेस शाहनिशा न करता अनेकांना कर्ज वाटली’ ‘काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी कोणतीही शाहनिशा न करता मागेल त्याला कर्ज दिलं. त्याचे मोठे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण आमच्या सरकारने ही पद्धतच बंद केली. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान रोखता आलं.’ असं पंतप्रधान म्हणाले. याचवेळी मोदींनी त्यांच्या सरकारने चार वर्षात केलेलं कामाचा लेखाजोखा लोकसभेत मांडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 Pm : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget