एक्स्प्लोर

Paper Leak Cases In India : राजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातील 'ही' पाच राज्ये पेपर फुटीमध्ये आघाडीवर, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा

Maximum Number Of Paper Leak Cases : NEET UG परीक्षा वादात सापडल्यानंतर पुन्हा एकदा पेपरफुटीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.  

नवी दिल्ली : पहिला नीटचा पेपर फुटला (NEET Paper Leak), नंतर नेटचा पेपर फुटला (NET Paper Leak) आणि देशभरात विद्यार्थी वर्गांत पुन्हा एकदा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. पेपर फुटण्याची किंवा कोणतीही परीक्षा वादात सापडण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेक वेळा असे घडलं आहे. त्यानंतर पेपर रद्द तरी झाले किंवा त्यावर समिती बसून तपास करण्यात आला. गेल्या 7 वर्षांमध्ये 15 राज्यांमध्ये पेपरफुटीचे 70 प्रकरणे समोर आली आहेत.

यावेळी NEET UG परीक्षा 24 लाख मुलांनी दिली आणि पेपरफुटीचा त्यांना फटका बसला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याची केसदेखील न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील कोणत्या राज्यांमध्ये पेपरफुटीच्या सर्वाधिक घटना घडल्या ते पाहुयात, .

राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले आहेत. राजस्थानमध्ये सात परीक्षांचे पेपर फुटले असून त्याद्वारे 40,590 पदे भरायची होती. त्यामुळे याचा फटका 38 लाख 41 हजार उमेदवारांना बसला.

मध्य प्रदेश आणि तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर

पेपर लीक प्रकरणात तेलंगणा आणि मध्य प्रदेश संयुक्तपणे राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये 5 पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तेलंगणामधी भरती परीक्षांद्वारे एकूण 3,770 पदे भरायची होती आणि यामुळे 6,74,000 उमेदवार अडचणीत आले होते. मध्य प्रदेशातही एकूण 5 प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे 3,690 पदांवर भरती करायची होती. 1,64,000 उमेदवारांना या पेपरफुटीचा फटका बसला.

उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर

पेपर लीक प्रकरणात उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1,800 पदांच्या भरतीसाठी असलेले चार पेपर फुटले होते. या परीक्षेसाठी 2,37,000 उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यामुळे सर्वांना याचा फटका बसला.

गुजरात चौथ्या क्रमांकावर

पेपर फुटीमध्ये गुजरात आणि बिहार ही दोन राज्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. बिहार आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये पेपर लीकची एकूण तीन प्रकरणे समोर आली आहेत. बिहारमध्ये 24,380 आणि गुजरातमध्ये 5,260 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. बिहारमधील सुमारे 22 लाख 87 हजार उमेदवारांना याचा फटका बसला. तर गुजरातमध्ये या परीक्षांमध्ये सुमारे 16 लाख 41 हजार उमेदवारांना पेपरफुटीचा फटका बसला. 

जम्मू आणि काश्मीर पाचव्या स्थानावर

पेपर फुटीच्या या यादीतील पुढचे नाव जम्मू-काश्मीरचे आहे. या राज्यांत एकूण 3 पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे 2,330 पदांवर भरती होणार होती. या परीक्षांसाठी 2,49,000 उमेदवारांनी अर्ज केले होते आणि त्या सर्वांना याचा फटका बसला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget