एक्स्प्लोर

'कॅशलेस सोसायटी' हे आपलं ध्येय, 'लेस-कॅश सोसायटी'पासून सुरुवात : मोदी

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी नोटीबंदीनंतर शांतपणे काम करणाऱ्या बँक आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मोदींनी 'कॅशलेस सोसायटी'बाबत सविस्तर भूमिका मांडली. 'कॅशलेस सोसायटी' हे ध्येय 'कॅशलेस सोसायटी' हे आपलं ध्येय आहे. कदाचित काही प्रमाणात हे ध्येय पूर्ण होणार नाही. मात्र, किमान 'लेस-कॅश सोसायटी'पासून ध्येयपूर्तीसाठी सुरुवात आपण नक्कीच करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 'कॅशलेस सोसायटी'बाबत बोलताना मोदी पुढे म्हणाले, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी देशातील नागरिकांची मदत गरजेची आहे. ई-वॉलेट म्हणजेच ई-बटवा - मोदी "हल्ली प्रत्येक बँक ऑनलाईन सुविधा देते. प्रत्येक बँकेचं मोबाईल अॅप आहे, वेगवेगळे कार्ड आहेत, वॉलेट आहेत. हे वॉलेट म्हणजेच ई-बटवा. बँकेच्या या सर्व सुविधांचा वापर गरेजचा आहे.", असे मोदींनी सांगितले. नोटाबंदीनंतर Rupay Card चा वापर वाढला - मोदी नोटाबंदीच्या निर्णयानंतर Rupay Card चा जास्तीत जास्त वापर झाला. गरिबांनीही या कार्डचा वापर सुरु केला आहे. या कार्डच्या वापरात 300 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 'कॅशलेस सोसायटी' बनवण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष दिलं आहे. सर्व बँकांही यासाठी प्रयत्नशील आहे. आता तर ऑनलाईन सरचार्जही रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. गरिबांनी श्रीमंतांच्या आमिषाला बळी पडू नये - मोदी "श्रीमंतांनी गरिबांच्या आयुष्याचा खेळ करु नये. काहीजण आपल्याकडील काळा पैसा खपवण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधत आहेत. यासाठी गरिबांना हाताशी धरलं जात आहे. गरिबांनी श्रीमंतांच्या आमिषाला बळी पडू नये", असं आवाहन पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून केले. देशाच्या विकासासाठी मोठे निर्णय गरजेचे - मोदी देशाच्या विकासासाठी मोठे निर्णय गरजेचे आहेत. नोटाबंदीचा निर्णय घेताना पुढील संकाटांची माहिती होती. मात्र, 70 वर्षे ज्या आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीचं अभियान सरळ असू शकत नाही, असे मोदी म्हणाले. बँक, पोस्ट कर्मचाऱ्यांचं कौतुक नोटाबंदीनंतर अनेक अडचणींमध्येही शांतपणे काम करणाऱ्या बँक आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं. तर या निर्णयानंतर संयम बाळगणाऱ्या सामान्य लोकांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget