एक्स्प्लोर

अविश्वास प्रस्ताव : 11 वाजता चर्चेला सुरुवात, सात तासांची वेळ राखीव

यूपीए प्रमुख सोनिया गांधींनी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली.

संसदेत अविश्वास ठराव : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत. यूपीए प्रमुख सोनिया गांधींनी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी यावर चर्चा आणि मतदानासाठी शुक्रवारची वेळ दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अविश्वास प्रस्ताव चर्चेदरम्यान बोलतील. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी संसदेत बोलण्याची शक्यता कमीच आहे. अविश्वास प्रस्तावात विविध पक्षांनी बोलण्याची वेळ ठरवण्यात आली आहे. पक्षाच्या संख्येनुसार वेळ ठरवण्यात आली आहे. भाजपला सर्वाधिक 3 तास 33 मिनिट बोलण्यासाठी वेळ मिळेल, तर काँग्रेसला 38 मिनिटे वेळ देण्यात आली आहे. यासोबतच एआयएडीएमके 29 मिनिट आणि टीएमसीला 27 मिनिटे देण्यात आले आहेत. कोणत्या पक्षाला किती वेळ? भाजप- 3 तास 33 मिनिट काँग्रेस- 38 मिनिट AIADMK- 29 मिनिट टीएमसी- 27 मिनिट बीजेडी- 15 मिनिट शिवसेना- 14 मिनिट टीआरएस- 9 मिनिट टीडीपी- 13 मिनिट सीपीआयएम- 7 मिनिट एनसीपी- 6 मिनिट एसपी- 6 मिनिट एलजेएसपी- 5 मिनिट शिरोमणी अकाली दल, आरएलएसपी, एडी- 12 मिनिट इतर - 26 मिनिट कसं असेल चर्चेचं स्वरुप? लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी अकरा वाजता सुरु होईल. सभागृहात उद्या प्रश्नोत्तराचा काळ होणार नाही आणि लंचही नसेल. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी सात तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने पाच मोठे नेते आणि मंत्री चर्चेत सहभाग घेतील. शिवसेनेच्या भूमिकेवर सस्पेंस अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला काही तास उरले असताना शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी मोठा वक्तव्य केलं आहे. शिवसेना सरकारच्या बाजूने मतदान करणार या ज्या बातम्या दिसत आहेत, त्या निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच यावर अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. पाठिंब्यासाठी टीडीपीचं समर्थन अभियान अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा द्या या मागणीसाठी टीडीपीच्या खासदारांनी दिवसभर समर्थन अभियान राबवलं. टीडीपी नेत्यांनी सहा गट बनवून एनडीए आणि यूपीएच्या नेत्यांशी चर्चा केली. एनडीएतील अकाली दल, जेडीयू आणि इतर पक्षांच्या नेत्यांकडे समर्थनाची मागणी केली. टीडीपीने यासोबतच हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तामिळ, मल्याळम यासह इतर भाषांमध्ये एक पुस्तिका वाटली, ज्यामध्ये आंध्र प्रदेशसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या आश्वासनांचा समावेश आहे. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला अविश्वास प्रस्तावावर चर्चेची सुरुवात करतील. टीडीपीचाच अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी एनडीएची साथ सोडली होती. एआयएडीएमकेचं मत सरकारच्या बाजूने तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानिसामी यांनी सरकारच्या बाजूने मत देणार असल्याचे संकेत दिले. एआयएडीएमके हा तामिळनाडूतील सत्ताधारी आणि लोकसभेतील सर्वात मोठा तिसरा (37) पक्ष आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशच्या मुद्द्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. एआयएडीएमकेच्या खासदारांनी जेव्हा कावेरी बोर्डाच्या मागणीसाठी आवाज उठवला तेव्हा कुणीही पाठिंबा दिला नाही, असं पलानिसामी म्हणाले. लोकसभेतील संख्याबळ लोकसभेत एकूण 543 जागा आहेत, ज्यामध्ये सध्या दहा जागा खाली आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये भाजपकडे 272, एलजेपी सहा आणि इतर पक्षांच्या 16 जागा मिळून आकडा 294 पर्यंत जातो. तर यूपीएकडे काँग्रेस 48, राष्ट्रवादी काँग्रेस 7, आरजेडी 4 आणि अन्य आठ जागा मिळून आकडा 67 पर्यंत जातो. एआयडीएमकेने अविश्वास प्रस्तावामध्ये सरकारची बाजू देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याकडे 37 खासदार आहेत. त्यामुळे एनडीए प्लसचा आकडा 331 पर्यंत जातो. यूपीएमध्ये काँग्रेस 48, इतर मित्रपक्ष 19 आणि इतर पक्षांच्या जागा (117) मिळून यूपीए प्लसचा आकडा 184 होतो. शिवसेनेची भूमिका अद्यापही ठरलेली नाही. मोदी सरकार सुरक्षित कशामुळे? लोकसभेत 543 जागा आहेत, मात्र 10 जागा खाली असल्यामुळे सदस्यसंख्या 533 होते. यापैकी बहुमतासाठी 268 जागांचीच गरज आहे. भाजपकडेच स्वतःचे 272 खासदार आहेत. एनडीएच्या खासदारांचा यामध्ये समावेश केल्यास आकडा 349 पर्यंत जातो, जो बहुमतापेक्षा 44 ने जास्त आहे. एआयडीएमके (37), बीजेडी (19), टीआरएस (11) या पक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानचं विमान पाडणारा योद्धा आता नवीन भूमिकेत, विमानसेवेच्या क्षेत्रात टाकलं पुढचं पाऊल, काय असणार भूमिका?
पाकिस्तानचं विमान पाडणारा योद्धा आता नवीन भूमिकेत, विमानसेवेच्या क्षेत्रात टाकलं पुढचं पाऊल, काय असणार भूमिका?
सोनं चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! दरात झाली मोठी घसरण, आजचे दर काय? नेमकी किती झाली घट?
सोनं चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! दरात झाली मोठी घसरण, आजचे दर काय? नेमकी किती झाली घट?
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Embed widget