एक्स्प्लोर

परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

परस्पर सहमीतनं घटस्फोटासाठी पती-पत्नीनं अर्ज केला असेल तर यापुढे त्यांना सहा महिने वाट पाहण्याची गरज नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

नवी दिल्ली : परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी यापुढे सहा महिने थांबणं अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं काल (मंगळवार) दिला आहे. हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. या कलमाअंतर्गत घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर 6 महिने वाट पाहावी लागते. याआधी घटस्फोटाचा पहिला अर्ज कोर्टासमोर आल्यानंतर दुसरा अर्ज दाखल करण्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागत होती. पती-पत्नी पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यावर विचार करता यावा यासाठी 6 महिन्यांचा हा कालावधी देण्यात आला होता. त्यासाठीच कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोर्ट दोन्ही पक्षकारांना 6 महिन्यांचा वेळ देतात. या कालावधीनंतरही जर पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार नसतील तर कोर्ट त्यांचा घटस्फोट मान्य करतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि यू यू ललित यांच्या खंडपीठानं सहा महिन्यांचा हा कालावधी देखील संपुष्टात आणला. यावेळी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की, 6 महिन्यांचा वेळ द्यायचा की नाही हे दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अवलंबून असणार आहे. खास परिस्थितीत न्यायमूर्ती हे तात्काळ घटस्फोटाचे आदेशही देऊ शकतात. divorce-580x395 कोणत्या विशिष्ट परिस्थितीत तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येणार हे देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
  1. घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीच पती-पत्नी हे दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्यास त्यांना तात्काळ घटस्फोट मिळू शकतो.
 
  1. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारे समेट होण्याची शक्यता नसल्यास तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येईल.
 
  1. जर दोन्ही पक्षकारांनी पोटगी, मुलांवरील हक्क आणि इतर मुद्दे सामंजस्यानं सोडवले असतील तर त्यांचा तात्काळ घटस्फोट मान्य करता येईल.
 
  1. सहा महिन्यांचा कालावधी दोघांसाठी आणखी त्रासदायक ठरणार आहे असं वाटत असल्यास त्यांचा घटस्फोट तात्काळ मान्य करण्यात यावा.
  सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की, घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर पती-पत्नी वर दिलेल्या परिस्थितीचा संदर्भ देऊन तात्काळ घटस्फोटाची मागणी करु शकतात. हा निर्णय दिल्लीतील एका घटस्फोट प्रकरणावर देण्यात आला. 8 वर्षापासून पती-पत्नी हे वेगळे राहत होते. त्यानंतर त्यांनी तीस हजारी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याआधीच त्यांनी पोटगी, मुलांवरील हक्क यासारखे प्रश्न आपआपसात सोडवले. पण तरीही न्यायमूर्तींनी त्यांना सहा महिने थांबण्यास सांगितलं. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात 6 महिने थांबणं अनिवार्य नसल्याचं म्हणत मोठा निर्णय दिला. तसेच देशातील सर्व कौटुंबिक न्यायलयानं आदेश दिले की, आता ते हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य मानू नये. जर गरज वाटत असेल तर त्यांनी तात्काळ घटस्फोटाचे आदेश द्यावे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget