एक्स्प्लोर

परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

परस्पर सहमीतनं घटस्फोटासाठी पती-पत्नीनं अर्ज केला असेल तर यापुढे त्यांना सहा महिने वाट पाहण्याची गरज नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

नवी दिल्ली : परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी यापुढे सहा महिने थांबणं अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं काल (मंगळवार) दिला आहे. हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. या कलमाअंतर्गत घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर 6 महिने वाट पाहावी लागते. याआधी घटस्फोटाचा पहिला अर्ज कोर्टासमोर आल्यानंतर दुसरा अर्ज दाखल करण्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागत होती. पती-पत्नी पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यावर विचार करता यावा यासाठी 6 महिन्यांचा हा कालावधी देण्यात आला होता. त्यासाठीच कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोर्ट दोन्ही पक्षकारांना 6 महिन्यांचा वेळ देतात. या कालावधीनंतरही जर पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार नसतील तर कोर्ट त्यांचा घटस्फोट मान्य करतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि यू यू ललित यांच्या खंडपीठानं सहा महिन्यांचा हा कालावधी देखील संपुष्टात आणला. यावेळी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की, 6 महिन्यांचा वेळ द्यायचा की नाही हे दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अवलंबून असणार आहे. खास परिस्थितीत न्यायमूर्ती हे तात्काळ घटस्फोटाचे आदेशही देऊ शकतात. divorce-580x395 कोणत्या विशिष्ट परिस्थितीत तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येणार हे देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
  1. घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीच पती-पत्नी हे दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्यास त्यांना तात्काळ घटस्फोट मिळू शकतो.
 
  1. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारे समेट होण्याची शक्यता नसल्यास तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येईल.
 
  1. जर दोन्ही पक्षकारांनी पोटगी, मुलांवरील हक्क आणि इतर मुद्दे सामंजस्यानं सोडवले असतील तर त्यांचा तात्काळ घटस्फोट मान्य करता येईल.
 
  1. सहा महिन्यांचा कालावधी दोघांसाठी आणखी त्रासदायक ठरणार आहे असं वाटत असल्यास त्यांचा घटस्फोट तात्काळ मान्य करण्यात यावा.
  सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की, घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर पती-पत्नी वर दिलेल्या परिस्थितीचा संदर्भ देऊन तात्काळ घटस्फोटाची मागणी करु शकतात. हा निर्णय दिल्लीतील एका घटस्फोट प्रकरणावर देण्यात आला. 8 वर्षापासून पती-पत्नी हे वेगळे राहत होते. त्यानंतर त्यांनी तीस हजारी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याआधीच त्यांनी पोटगी, मुलांवरील हक्क यासारखे प्रश्न आपआपसात सोडवले. पण तरीही न्यायमूर्तींनी त्यांना सहा महिने थांबण्यास सांगितलं. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात 6 महिने थांबणं अनिवार्य नसल्याचं म्हणत मोठा निर्णय दिला. तसेच देशातील सर्व कौटुंबिक न्यायलयानं आदेश दिले की, आता ते हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य मानू नये. जर गरज वाटत असेल तर त्यांनी तात्काळ घटस्फोटाचे आदेश द्यावे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget